Akkalkot Swami Samarth Temple : अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ मंदिर परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

सोलापूर : अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरात तीर्थक्षेत्र विकासकामांसाठी रखडलेले भूसंपादन अखेर अक्कलकोट नगरपालिकेने हाती घेतले आहे. यात ११०६२ चौरस मीटर जमीन संपादित करण्यासाठी नगरपालिकेने प्रसिद्धीकरण केले आहे.


एकीकडे राज्य शासनाने अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकासकामांच्या आराखड्यास मंजुरी दिली असताना दुसरीकडे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून रखडलेले भूसंपादन करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्यामुळे आगामी काळात श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा गुदमरलेला श्वास मोकळा होणार आहे.



अक्कलकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रमाकांत डाके यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील जागा १९७८ साली शासनाने विकासासाठी आरक्षित केली होती. त्याप्रमाणे ही जागा संपादन करण्याची जबाबदारी श्री स्वामी समर्थ मंदिर समितीवर निश्चित करण्यात आली होती. त्यासंबंधी मंदिर समितीची नगरपालिका प्रशासनाने वेळोवेळी पत्रव्यवहारही केला होता. परंतु भूसंपादन रखडले होते. आवश्यक कालावधी टळल्यानंतरही भूसंपादन न झाल्यामुळे मूळ जागामालकांनी जागा खरेदी करण्यासाठी न्यायालयात धाव घेऊन नोटीस बजावली होती. कायदेशीर नियमानुसार आरक्षण निश्चित झाल्यानंतर पुढे एक वर्षाच्या मुदतीत जागा संपादित करणे आवश्यक आहे. अन्यथा आरक्षण रद्द होऊ शकते. त्यामुळे अक्कलकोट शहराचे मोठे नुकसान होऊ शकते. त्याचा विचार करूनच नगरपालिकेने जागा संपादनासाठी प्रक्रिया हाती घेतली आहे.

Comments
Add Comment

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या

Onion Farmers : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा

सरकारी खरेदीदरात १३ टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल २ हजार १२५ रुपये दर निश्चित मुंबई : कांदा उत्पादक

Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर

Devendra Fadnavis : हवामान विभागाचे अलर्ट पाहूनच घराबाहेर पडा!

मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन; कनेक्टिंग लिंकवरील खड्ड्यांच्या आरोपांना सडेतोड उत्तर मुंबई : "राज्यात