Khambatki Ghat : खंबाटकी घाटात प्रवाशांचे हाल! सुट्टी साजरी करायला गेले अन् वाहतूक कोंडीत अडकले

पुणे : नाताळसणानिमित्त (Christmas Holiday) अनेक शाळांसह काही कार्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे या कालावधीत अनेकजण आपल्या मित्रपरिवारासह फिरायला जाण्याचे प्लॅन तयार करतात. अशातच आजही सुट्टीनिमित्त अनेकजण पर्यटनस्थळी जाण्यासाठी निघाले आहेत. मात्र यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचे दिसून येत आहे. अशातच पुण्याहून साताराकडे जाणाऱ्या खंबाटकी घाटातही (Khambatki Ghat) मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून सातारला जाताना खंबाटकी घाट या एकेरी मार्गावर अनेक वाहने बंद पडली आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच या मार्गावर जवळपास ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जवळपास एका-दीड तासापासून घाटात वाहतूक कोंडी झाली आहे.


दरम्यान, एकाच ठिकाणी वाहने थांबून राहिल्यामुळे प्रवास करणाऱ्या लहान मुले, महिलांसह वयोवृद्ध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात