Christmas : नाताळच्या सणानिमित्त काशिद-बिच पर्यटकांनी फुलला!

नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुड हाऊसफुल्ल


मुरुड : नाताळच्या सणानिमित्त ख्रिसमसच्या (Christmas) स्वागतासाठी नववर्षाच्या स्वागतासाठी मुरुड जंजिरा पाहण्यासाठी तुफान गर्दी होत आहे. पर्यटनात जगाच्या पटलावर नावारूपाला आलेल्या मुरुड तालुक्यातील काशिद-बिच (Kashid Beach) समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला असून रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या दिसून येतात.


काशिद-बिच समुद्र किनारा भरतीच्या वेळेस फेसाळणारे पाणी, उसळणाऱ्या लाटा, किनाऱ्यावरील शुभ्र वाळू येथे पर्यटकांना आकर्षित करते.पर्यटकांच्या सोयी-सुविधात याठिकाणी असलेली स्पीडबोट, पॅरेसेलिंगबोट, बनाना, बंफर तसेच घोडा-उंटावरील सफर पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करते.याठिकाणी विविध खाद्य-पेय चहा-नाष्टा सोयी सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी दर शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात.



रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी ट्रॅफिक जॅमलाही सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक देखील आवर्जून भेट देत असतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ गार्ड, स्थानिक, स्टॉलधारक, ग्रामपंचायतचे सहकार्य लाभते. पोलीस ही आपली कामगिरी उत्तम प्रकारे पार पाडतात. ग्रामपंचायत तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, श्रीसदस्य, विविध सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येत असल्याने समुद्र किनारा चकाचक करण्यात येत असतो.


आतापासूनच याठिकाणी पर्यटकांची मांदियाळी दिसून येते आहे. सरत्या २०२४ सालाला निरोप देण्यासाठी व सन २०२५ चे स्वागत करण्यासाठी काशिद-बिच समुद्र किनारा फुलला असून थर्टीफस्टसाठी लॉज बुकिंग फुल होऊ लागले आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले आहेत.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे