Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! ख्रिसमसच्या सुट्टीमुळे मध्य रेल्वेने घेतला 'हा' निर्णय

मुंबई : आज नाताळसणानिमित्त अनेक कार्यालयांना सुट्टी असते. मात्र काही कार्यालयांना सुट्टी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडावे लागत आहे. परंतु मध्य रेल्वेचा (Central Railway) प्रवास करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना ख्रिसमसच्या सुट्टीचा (christmas holiday) फटका बसत आहे.



नाताळसणाच्या सुट्टीमुळं मध्य रेल्वेने आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या डीआरएम यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली. त्यामुळे आज काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रवासात अडथळे निर्माण होत असून नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.


मध्य रेल्वेवर दररोज १८१० लोकल सेवा चालवल्या जातात आणि रविवारी त्यापैकी सुमारे ३५० ते ४०० लोकल कमी धावतात. दरम्यान, आज प्रवाशांना रेल्वे गर्दीचा त्रास कमी राहणार असला तरीही रेल्वेच्या वेळापत्रकातील या बदलामुळे दररोजच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही

तब्बल २ लाख ४४ हजार कोटींचे पायाभूत सुविधा प्रकल्प, राखीव निधी केवळ ३६ हजार कोटी

मुंबई: मुंबई महापालिच्यावतीने पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले असून आता या प्रकल्पांचा खर्च २ लाख ४४

क्रांतिसूर्य स्वा.सावरकर यांच्या सन्मानार्थ मुंबईतून किमान १० हजार स्वाक्षऱ्यांचे पत्र केंद्र व राज्य सरकारला पाठवणार

मुंबई: मुंबईमधील दादर पश्चिमेकडील बालमोह शाळेशेजारील सावरकर सदन हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

Satara: कराडमधील यशवंत को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात ५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल

सातारा: कराडमधील गाजलेल्या यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील ११२ कोटी १० लाख रुपयांच्या अपहार प्रकरणात मुख्य आरोपी आणि

अनिल अंबानींचे मुंबईतील करोडो रुपयांचे निवासस्थान ईडीकडून जप्त

मुंबई : रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुपचे (रिलायन्स एडीए ग्रुप) चेअरमन अनिल अंबानी यांचे "अ‍ॅबोड" निवासस्थान

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील