Central Railway : प्रवाशांचा खोळंबा! ख्रिसमसच्या सुट्टीमुळे मध्य रेल्वेने घेतला 'हा' निर्णय

  128

मुंबई : आज नाताळसणानिमित्त अनेक कार्यालयांना सुट्टी असते. मात्र काही कार्यालयांना सुट्टी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडावे लागत आहे. परंतु मध्य रेल्वेचा (Central Railway) प्रवास करणाऱ्या या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांना ख्रिसमसच्या सुट्टीचा (christmas holiday) फटका बसत आहे.



नाताळसणाच्या सुट्टीमुळं मध्य रेल्वेने आज रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या डीआरएम यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली. त्यामुळे आज काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रवासात अडथळे निर्माण होत असून नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.


मध्य रेल्वेवर दररोज १८१० लोकल सेवा चालवल्या जातात आणि रविवारी त्यापैकी सुमारे ३५० ते ४०० लोकल कमी धावतात. दरम्यान, आज प्रवाशांना रेल्वे गर्दीचा त्रास कमी राहणार असला तरीही रेल्वेच्या वेळापत्रकातील या बदलामुळे दररोजच्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.