नाताळच्या दिवशी गोव्यात प्रवासी बोट बुडाली

पणजी : ऐन नाताळच्या दिवशी गोव्यातील कळंगुट समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना घेऊन जात असलेली एक बोट बुडाली. या दुर्घटनेत एका पर्यटकाचा मृत्यू झाला. इतर २० जणांना वाचवण्यात आले. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बोटीत महाराष्ट्रातल्या खेडमधील एका कुटुंबातले १३ सदस्य होते. हे सर्व जण सुखरुप आहेत.


बोट बुडाल्यामुळे ५४ वर्षांच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला. इतरांना वाचवण्यात आले. दुर्घटनेनंतर काही जणांची तब्येत बिघडली होती, त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बोटीतील दोन जणांनी वगळता इतर सर्वांनी जीवरक्षक अंगरखा अर्थात लाईफ जॅकेट परिधान केले होते; असेही पोलिसांनी सांगितले. दोन मुले आणि दोन महिला यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरांना प्रकृती स्थिर झाल्यानंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमध्ये सहा आणि सात वर्षांच्या अशा दोन मुलांचा तसेच २५ आणि ५५ वर्षांच्या अशा दोन महिलांचा समावेश आहे.


बोट किनाऱ्यापासून सुमारे ६० मीटर अंतरावर समुद्रात बुडाली. बोट बुडत असल्याची जाणीव होताच कळंगुट समुद्र किनाऱ्यावर कार्यरत असलेल्या १८ जीवरक्षकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. यामुळे मोठी जीवितहानी टळली. काही दिवसांपूर्वी मुंबईत नौदलाच्या स्पीड बोटीच्या इंजिनाची चाचणी सुरू असताना अपघात झाला होता. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया जवळ नीलकमल नावाच्या फेरीबोटीला स्पीड बोटची धडक बसली. या अपघातात १५ पर्यटकांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण