Rape on Puppy : कुत्र्याच्या पिलावर अत्याचार, नराधमाची जामिनावर सुटका

मुंबई : अवघ्या दीड महिन्यांच्या कुत्र्याच्या पिलावर अत्याचार झाला. हे विकृत कृत्य केल्याचा आरोप असलेल्या नराधमाची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणात मुक्या जीवाला न्याय मिळावा म्हणून एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सरसावली आहे.



पोलिसांनी कुत्र्याच्या पिलावरील अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. आरोपीची जामिनावर सुटका झाली आहे. ही माहिती मिळताच प्राणीप्रेमी संस्थांनी कुत्र्यावर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत सोशल मीडियावर विशेष मोहीम हाती घेतली आहे.



'क्योंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी मुंबईच्या नायगाव परिसरातून पीडित दीड महिन्याच्या कुत्र्याच्या पिलाची सुटका केली आहे. मुक्या जीवाला न्याय मिळवून देण्यासाठी जया भट्टाचार्य पण सोशल मीडियावरील विशेष मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. माणसाच्या तुलनेत अनेक मुक्या जीवांचे आयुष्य अवघ्या काही महिन्यांचे असते. ते त्यांच्या वेदना माणसाला समजतील अशा पद्धतीने बोलून व्यक्त करू शकत नाहीत. यामुळे ते स्वतःची बाजू मानवी न्यायालयात मांडू शकत नाहीत, म्हणून मुक्या जीवांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे जया भट्टाचार्य यांनी सांगितले. कुत्र्यावरील अत्याचार प्रकरणी लवकर न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.



जया भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात सोशल मीडियावर कुत्र्याच्या पिलाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे.कुत्र्याच्या पिलाच्या तब्येतीबाबत जया भट्टाचार्य दररोज सोशल मीडियावर अपडेट देत आहेत. जया यांच्या पोस्टवर अनेक अभिनेते - अभिनेत्री यांनी प्रतिक्रिया देत विकृत कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करायला सुरुवात केली आहे.
Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात