Tarak Mehta Ka Ulta Chashma Fame Bhide : गोकुलधाम सोसायटीच्या एकमेव सेक्रेटरींची खऱ्या आयुष्यातील माधवी झळकतेय 'या' मालिकेत

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा या शोने १७ हून अधिक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या शोने भारताचेच नाही तर भारताबाहेरील प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत. आजपर्यंत या मालिकेत आगळेवेगळे प्रयोग करण्यात आले. सुंदर लेखनासह , उत्तम दिग्दर्शन तसेच अफलातून मनोरंजन याचा ताळमेळ असलेली हि मालिका कायम प्रेक्षकांच्या पसंतीस येते. यातील पात्र सुद्धा प्रेक्षकांच्या जवळची झाली आहेत.


या मालिकेतील शिक्षकांच्या जवळच पात्र म्हणजे गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे म्हणजेच अभिनेता मंदार चांदवडकर. भिडेच्या या पात्रमुळे शिक्षकांनाही हे पात्र अगदी आपलसं वाटतं. मंदार चांदवडकरने यापुर्वी सुद्धा अनेक भूमिका साकारल्या मात्र आत्माराम तुकाराम भिडे या पत्रामुळे मंदार चांदवडकर घराघरात भिडे गुरुजी म्हणूनच ओळखला जाऊ लागला. मंदार प्रमाणेच त्याची पत्नी सुद्धा सिने इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.



स्टार प्रवाह वर नुकत्याच सुरू झालेल्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आत्माराम भिडेची खरी पत्नी महत्त्वपूर्ण भूमिका साकारते. याबाबत स्टार प्रवाहच्या अधिकृत इंस्टाग्राम वर नुकतीच एक पोस्ट शेअर करण्यात आली. मंदार चांदवडकर च्या पत्नीचे नाव स्नेहल असे आहे. इंस्टाग्राम वर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये स्नेहलच्या भूमिकेची ओळख करून देण्यात आली आहे. तोंडावर गोडपण आतून कारस्थानी, पैशांचा हव्यास असणारी पण मोठी कंजूस. स्नेहलच्या पात्राचे नाव मंजुषा सावंत असे आहे.


याबद्दल तिने म्हटले आहे की, "नमस्कार मी स्नेहल मंदार चांदवडकर. आणि मी तुम्हाला भेटायला येते मंजू या भूमिकेत. लग्नानंतर होईलच प्रेम या स्टार प्रवाहच्या मालिकेत मी मंजू ही भूमिका साकारते आहे. आमच्या या मालिकेत अनेक कलाकारांच्या वैविध्यपूर्ण भूमिका आहेत. त्यातली मंजू आपल्या कुटुंबासह तिच्या दादाच्या घरी राहत असते. थोडक्यात खूप आंबट गोड तिखट अशी माझी भूमिका आहे त्यामुळे ही मालिका नक्की बघा."

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात