One Nation One Election : एक देश, एक निवडणूक विधेयकावर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीची ८ जानेवारीला बैठक

नवी दिल्ली : एक देश, एक निवडणूक विधेयकावर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आठ जानेवारी रोजी होणार आहे. या बैठकीत पुन्हा एकदा काँग्रेस आणि डावे पक्ष विधेयकाला विरोध करणार आहेत. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एक देश, एक निवडणूक विधेयकाला विरोध करण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम असल्याचे सांगितले. सरकारने लोकसभेत सादर केलेले एक देश, एक निवडणूक हे विधेयक देशाच्या संघराज्य संरचनेला बाधक असल्याचे डाव्या पक्षांचे म्हणणे आहे.


भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी - लेनिनवादी) लिबरेशन, क्रांतीकारी समाजवादी पक्ष, ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या सर्वांनी संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत एक देश, एक निवडणूक विधेयकाला विरोध करणार असल्याचे जाहीर केले. देशाची संघराज्य संरचना सुरक्षित राहणे आवश्यक असल्याचीही भूमिका डाव्या पक्षांनी मांडली आहे. कोणतेही सरकार बहुमताच्या जोरावर संघराज्य संरचनेला बाधक असलेले निर्णय घेत असेल तर त्याला ठामपणे विरोध करणार असल्याचे डाव्या पक्षांनी जाहीर केले.



केंद्र सरकारने हिवाळी अधिवेशनात लोकसभेत एक देश, एक निवडणूक विधेयक सादर केले. हे विधेयक सभागृहाने बहुमताने संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले. विधेयकावर चर्चा करण्यासाठी समितीची पहिली बैठक बुधवार आठ जानेवारी २०२५ रोजी होत आहे. संयुक्त संसदीय समितीत ३१ सदस्य आहेत. यात लोकसभेत २१ आणि राज्यसभेतील दहा सदस्यांचा समावेश आहे. समितीत काँग्रेसच्या प्रियांका गांधी वाड्रा आणि मनीष तिवारी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी तसेच भाजपाचे पीपी चौधरी, बन्सुरी स्वराज, अनुराग ठाकूर हे प्रमुख सदस्य आहेत.


भारतात १९५१ - ५२, १९५७, १९६२ आणि १९६७ या वर्षी लोकसभा आणि विधानसभांसाठी देशात एकाचवेळी निवडणुका झाल्या होत्या. नंतर काही राज्यांच्या विधानसभा लवकर विसर्जित झाल्यामुळे निवडणुकांचे वेळापत्रक पुढे - मागे होण्यास सुरुवात झाली.आता केंद्र सरकार एक देश, एक निवडणूक विधेयकाद्वारे पुन्हा एकदा लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी कायदा करण्यास उत्सुक आहे. या प्रकरणात पुढे काय होते याकडे अनेकांचे लक्ष आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन