Menstrual Periods Problems : महिन्यातल्या 'त्या' पाच दिवसांची घडी विस्कटतेय तर हे करणे टाळाचं

मुंबई : स्त्रियांचे आरोग्य आणि मानसिक पाळी यांचे घनिष्ठ संबंध आहे. अनेकदा महिलांना मासिक पाळीबद्दल बऱ्याच समस्या जाणवतात. पूर्वीच्या महिलांची जीवनशैली त्याचबरोबर आताच्या महिलांच नेहमीचे वेळापत्रक यात साम्यता आढळते. जेवणापासून ते अगदी नेहमीच्या कामाच्या वेळाही अगदी विरुद्ध झाल्या आहेत. नियमित पाळी न येणे ही समस्या याच घटकांतून वर आली आहे.


खूप झोपणे, वजनात बदल, अयोग्य आहार, मानसिक ताण हे घटक नियमित पाळी न येण्यास कारणीभूत आहे. महिलांनी आपल्या शरीराला आवश्यक तेवढीच झोप घेणे गरजेचं आहे. गरजेप्रमाणे झोप घेतल्यास पाळी नियमित येते. अन्यथा स्थूलपणा वाढतो विशेषतः तरुणांमध्ये ही लक्षणे जाणवतात. वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जास्तीतजास्त बाहेरच खाणे टाळावे. उत्तम आहार उत्तम आरोग्याचे लक्षण आहे. अचानक वजनात वाढ झाल्याने किंवा वजन कमी झाल्याने मासिक पाळीवर त्याचा परिणाम होतो.



त्याचबरोबर जस जंक फूड मासिक पाळीला हानिकारक आहे तसेच तणावामुळे शरीराचे अनेक नुकसान होते. तसाच हा ताण पीरियड सायकलवर देखील परिणाम करू शकतो. तणाव कमी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा मासिक पाळीवर त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. यामुळे तुमची मासिक पाळी अनियमित होवू शकते. त्यामुळे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या शरीरावर देखील त्याचा चांगला परिणाम होईल.आणि मासिक पाळीत खंड पडणार नाही.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे