Satish Wagh Murder Case : सतीश वाघ खून प्रकरणात आणखी एकाला अटक

  105

पुणे : सतीश वाघ यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी आणखी एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तो खून झाल्याच्या घटनेपासून पोलिसांना गुंगारा देत होता. आतिश जाधव असे अटक केलेल्याचे नाव आहे.

जाधवला धाराशिवमधूून गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सतीश वाघ यांचा खून झाल्यापासून पोलीस जाधव याचा शोध घेत होते. सुरुवातीला पवन शर्मा (रा. धुळे ) आणि नवनाथ गुरळ (रा. फुरसुंगी ) या दोघांना ताब्यात घेतले होते. आता जाधव याला अटक केली आहे.



विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे 9 डिसेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास फुरसुंगी परिसरात मॉर्निंक वॉक करीत होते. याची संपूर्ण माहिती हल्लेखोरांनी गोळा केली होती.

वाघ किती वाजता व्यायामासाठी घराबाहेर पडतात, त्यांच्यासोबत कोणकोण असते, परिसरात सीसीटीव्ही आहेत का नाही, अपहरणानंतर त्यांना कुठे न्यायचे, अपहरणासाठी विनाक्रमांक मोटार वापरण्याची अशी पुरेपूर दक्षता घेत पाच जणांनी वाघ यांचे मोटारीतून अपहरण करून खून केला होता.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या