Shirdi Sansthan : शिर्डी संस्थानची गुंतवणूक पोहचली २९१६ कोटींवर! साईभक्तांमुळे ८१९ कोटींचे उत्पन्न; वर्षभरात ४१९ कोटींची वाढ

शिर्डी : शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांची मोठी रेलचेल पहायला मिळते. साईभक्त आपापल्या परीने साईंच्या तिजोरीत सोने, चांदी, हिरे, नाणी, पैसे, वस्तू स्वरुपात दान करताना दिसतात. गत आर्थिक वर्षात साई संस्थानला (Shirdi Sansthan) विविध मार्गाने ८१९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, संस्थानची एकूण गुंतवणूक ही २०१६ कोटींवर पोहचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही गुंतवणूक ४१९ कोटींची वाढल्याचे चित्र आहे.


साई दर्शनासाठी दररोज ५० हजारांहून अधिक साईभक्त शिर्डीत हजेरी लावताना दिसतात. संस्थानच्या माध्यमातून या साईभक्तांना चहा, पाणी, भोजन प्रसाद, लाडू प्रसाद, निवास व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांची संख्या वाढती आहे. यातून स्थानिक अर्थकारण फिरतेच, शिवाय संस्थानच्या उत्त्पन्नातही मोठी भर पडताना दिसत आहे.


साई संस्थानच्या लेखापरीक्षण अहवालानुसार, दि. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थानच्या राष्ट्रीयकृत बँकेत ठेवी स्वरुपात २९१६ कोटींची रक्कम गुंतवणूक केलेली आहे. तर एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात साईंच्या दक्षिणा पेटीत १७६ कोटींचे दान साईभक्तांनी टाकले आहे. सर्वसाधारण देणगी १२१ कोटींची प्राप्त झाली आहे.



सोने, चांदी व मौलवान खडे ११ कोटींचे दान साई तिजोरीत मिळाले आहे. अन्नदान निधी म्हणून ९६ कोटी, रुग्णालयासाठी ५४ कोटी, प्रसादालयासाठी ४६ कोटी, इमारत देखभाल दुरुस्तीसाठी ३२ कोटी, वस्तु स्वरुपात ८ कोटी, इतर असे एकूण ८१९ कोटी रुपयांचे उत्पन्न साई संस्थानला मिळाले आहे. यामध्ये २९१६ कोटींच्या गुंतवणुकीवरील २०० कोटींच्या व्याजाचाही समावेश आहे. एकूण, साईभक्तांच्या दातृत्वामुळे संस्थानला शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरवणे शक्य होत आहे. येणार्या काळात आणखी सुविधा पुरविण्यावर संस्थान भर देणार असल्याचे चित्र आहे.



साईभक्तांच्या सुविधांसाठी ४८९ कोटींचा खर्च!


साईभक्तांच्या सोयीसुविधांसाठीच्या कामांकरीता शिर्डी नगरपरिषदेला साईंच्या उत्पन्नातून काही रक्कम देण्यात आलेली आहे. तसेच नियोजित शैक्षणिक संकुल प्रकल्पातील इमारतींचे फर्निचर वर्कचे काम प्रगतीपथावर आहे. संस्थान मालकीचे २४ प्लॉट आहेत. त्यांना संरक्षक कंपाऊंड केले जात आहे. संस्थान कर्मचार्यांसाठी वाहन पार्किंग उभारली जात आहे. लाडू व बुंदी प्रोसेसिंगचे २० कोटींचे युनीट उभारले जाणार आहे. नवीन भांडार इमारतीसाठी ११ कोटी मंजूर झाले आहेत.लेखाशाखा विभागाचे स्टाँग़रुम बांधली जाणार आहे, जलवाहिनी, काही इमारती व कॅन्टीनचे नूतनीकरण, लाँन्ड्री युनिट उभारणी, साईनाथ रुग्णालयासाठी केसपेपर इमारत उभारणे, यासह १६ प्रकल्प प्रस्तावित आहे. आतापर्यंत्त साईभक्तांसाठी सेवेसाठी एकूण उत्पन्नातून संस्थानने ४८९ कोटींचा खर्च केल्याचे अहवालातून पुढे आले आहे.

Comments
Add Comment

अशोक खरात कारनाम्याचा भांडाफोड, १८ मार्च रोजी कसा झाला आरोपी?, जाणून घ्या

नाशिक: बड्या बेड्या नेत्यांचा 'गुरु' असलेल्या कॅप्टन अशोक खरातच्या कारनाम्याचा भांडाफोड सुरू झाला आहे. जवळपास ५८

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस पडणार, हवामान विभागाकडून पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ