Pune: पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू

पुणे: पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. येथे फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले. त्यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात २ मुले आणि एका व्यक्तीचा समावेश आहे. यासोबतच ६ जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


ही घटना वाघोळीच्या केसनंद फाट्याजवळ घडली. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही अपघाताची दुर्देवी घटना घडलीय. यावेळी डंपरचा चालक नशेत होता अशी माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.



फुटपाथवर लोकांना चिरडत गेला डंपर


या अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. ते रविवारी रात्रीच कामाच्या निमित्ताने अमरावती येथून आले होते. या फुटपाथवर एकूण १२ जण झोपले होते. तर इतर लोक फुटपाथच्या बाजूला एका झोपडीत झोपले होते. यावेळी भरधाव डंपर फुटपाथवर चढला आणि लोकांना चिरडत गेला.

आरोपी डंपर ड्रायव्हरला अटक


जेव्हा ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर तातडीने पोलिसांना खबर देण्यात आली. दारूच्या नशेत असलेल्या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर केस दाखल करण्यात आली आहे.


काहीच दिवसांपूर्वी घडला होता अपघात


याच महिन्यात काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये झालेल्या रस्ते अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झाला होता. तर दोनजण गंभीररित्या जखमी झाले होते. हा अपघात इंदापूरमध्ये घडला होता. यावेळी बारामती येथून भिगवणला जात असलेल्या कारला अपघात झाला होता. या कारमधून ४ जण प्रवास करत होते.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये