Pune: पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले, ३ जणांचा जागीच मृत्यू

पुणे: पुण्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. येथे फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना डंपरने चिरडले. त्यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. यात २ मुले आणि एका व्यक्तीचा समावेश आहे. यासोबतच ६ जण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


ही घटना वाघोळीच्या केसनंद फाट्याजवळ घडली. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही अपघाताची दुर्देवी घटना घडलीय. यावेळी डंपरचा चालक नशेत होता अशी माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.



फुटपाथवर लोकांना चिरडत गेला डंपर


या अपघातात जखमी झालेले सर्व मजूर आहेत. ते रविवारी रात्रीच कामाच्या निमित्ताने अमरावती येथून आले होते. या फुटपाथवर एकूण १२ जण झोपले होते. तर इतर लोक फुटपाथच्या बाजूला एका झोपडीत झोपले होते. यावेळी भरधाव डंपर फुटपाथवर चढला आणि लोकांना चिरडत गेला.

आरोपी डंपर ड्रायव्हरला अटक


जेव्हा ओरडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. त्यानंतर तातडीने पोलिसांना खबर देण्यात आली. दारूच्या नशेत असलेल्या ड्रायव्हरला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर केस दाखल करण्यात आली आहे.


काहीच दिवसांपूर्वी घडला होता अपघात


याच महिन्यात काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये झालेल्या रस्ते अपघातात दोन तरूणांचा मृत्यू झाला होता. तर दोनजण गंभीररित्या जखमी झाले होते. हा अपघात इंदापूरमध्ये घडला होता. यावेळी बारामती येथून भिगवणला जात असलेल्या कारला अपघात झाला होता. या कारमधून ४ जण प्रवास करत होते.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला