मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भुजबळ दिल्लीला रवाना

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटींनंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ आज,सोमवारी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील सागर यावेळी त्यांनी सुमारे ४० मिनीटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या भेटीत नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा याची माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांनी दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली.



सामाजिक, राजकीय मुद्यांवर बोललो. काय काय घडले, काय चालू आहे. त्याबाबत चर्चा झाली. हे आपण मान्यच करायला हवे. की जो महाविजय मिळाला आहे. त्यामागे ओबीसींचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर राहिले आहे. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. ओबीसींचे नुकसान फडणवीस होऊ देणार नाही. पण आता जे काही राज्यात सुरू आहे. येत्या ८ ते १० दिवसात आपण पुन्हा भेटू आणि एक चांगलामार्ग शोधून काढू, असे फडणवीस म्हणाले. तसेच मला विनंती आहे की, ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे.



हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असे फडणवीस म्हणाल्याचे भुजबळांनी सांगितले. दरम्यान भाजप प्रवेशावर भुजबळांनी स्पष्ट बोलण्याचे टाळले. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जाऊन कुणाला भेटणार, दिल्लीवारीचे प्रयोजन काय याबाबत गोपनियता पाळण्यात आलीय.

Comments
Add Comment

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील