मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भुजबळ दिल्लीला रवाना

मुंबई : राज्य मंत्रिमंडळात वर्णी न लागल्याने नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटींनंतर भुजबळांनी पत्रकार परिषद घेत आपली पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. छगन भुजबळ आणि समीर भुजबळ आज,सोमवारी सकाळी १०.३० वाजता मुंबईतील सागर यावेळी त्यांनी सुमारे ४० मिनीटे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या भेटीत नेमकी कुठल्या विषयांवर चर्चा याची माहिती छगन भुजबळ यांनी माध्यमांनी दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली.



सामाजिक, राजकीय मुद्यांवर बोललो. काय काय घडले, काय चालू आहे. त्याबाबत चर्चा झाली. हे आपण मान्यच करायला हवे. की जो महाविजय मिळाला आहे. त्यामागे ओबीसींचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर राहिले आहे. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. ओबीसींचे नुकसान फडणवीस होऊ देणार नाही. पण आता जे काही राज्यात सुरू आहे. येत्या ८ ते १० दिवसात आपण पुन्हा भेटू आणि एक चांगलामार्ग शोधून काढू, असे फडणवीस म्हणाले. तसेच मला विनंती आहे की, ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे.



हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असे फडणवीस म्हणाल्याचे भुजबळांनी सांगितले. दरम्यान भाजप प्रवेशावर भुजबळांनी स्पष्ट बोलण्याचे टाळले. त्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. दिल्लीत जाऊन कुणाला भेटणार, दिल्लीवारीचे प्रयोजन काय याबाबत गोपनियता पाळण्यात आलीय.

Comments
Add Comment

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०

वांद्रे (पश्चिम) येथे ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती, येत्या १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुरुस्तीचे काम घेणार हाती

मुंबई :  एच पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद; काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा पाली हिल

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यास मान्यता

मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त

मुंबईच्या महापौर पदासाठी रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांची उमेदवारी जाहीर; महापालिका राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात

मुंबई विशेष प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महापालिका राजकारणात मोठी

मुंबई महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. निकालानंतर महायुतीचाच महापौर

अजित पवारांच्या खासगी सचिवाची कसून चौकशी

मुंबई : अजित पवारांचे बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान अपघातात निधन झाले. या प्रकरणी राज्याच्या गुन्हे