काँग्रेसने डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडली नाही - एकनाथ शिंदे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या चिरस्मारकासाठी गिरगाव चौपाटीच्या जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र ती जागा तत्कालिन काँग्रेस सरकारने दिली नाही. अखेर दादर चौपाटीजवळील बाँबे पोर्ट ट्रस्टच्या जागेवर हे स्मारक उभे राहिले. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकराना सातत्याने अपमानित केलेच पण मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडली नाही असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

याबाबतची वस्तुस्थिती मांडताना, महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. योगिराज बागुल यांनी त्यांच्या 'आठवणीतले बाबासाहेब' या ग्रंथामध्ये ही बाब नमूद केली असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या म्हणण्याला पुष्टी देताना, शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या 'जनता' या नियतकालिकाच्या ७ जुलै १९३४ रोजीच्या अंकामध्ये काँग्रेस ही भांडवलदार आणि जमीनदारांची संस्था असल्याचा उल्लेख असल्याचे दाखवून दिले.




ती एनकेन प्रकारे त्यांचे हितसंबंध आणि त्यांची हुकूमत टिकवून ठेवण्यासाठी काम करणारी संस्था आहे असे मत बाबासाहेबांनीच या पुस्तकात व्यक्त केले असल्याचे दाखवून दिले. महायुती सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधानाबद्दलचे प्रेम अन्य कुणी शिकवण्याची गरज नसल्याचे सांगितले. काँग्रेसचे दलित बांधवांविषयी कायमच दुटप्पीपणाचे धोरण राहिले आहे. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच काँग्रेस हे जळते घर आहे त्यापासून दूर राहा असे सांगितले असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

काँग्रेसने सातत्याने बाबासाहेबांचा अपमान केला आहे. दोन वेळा कटकारस्थान करून काँग्रेसनेच बाबासाहेबांना निवडणुकीत हरवलं होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असूनही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला? याची कारणे तपासली मग काँग्रेसने बाबासाहेबांना कसे अपमानित केले ते आपल्या लक्षात येईल असे शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ