BSNLचा जिओ, एअरटेलला पुन्हा झटका! 'या' प्लॅनद्वारे ग्राहकांना मिळणार दरमहा 5000GB डेटा

  89

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी जिओ मागोमाग एअरटेल, व्हिआयसह इतर कंपन्यांनी मोबाईल रिचार्जचे दर वाढवल्यानंतर ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली होती. यादरम्यान बीएसएनएल (BSNL) या टेलिकॉम कंपनीने रिचार्जचे दर कमी केल्याने जिओ, एअरटेल, व्हिआय कंपनीच्या वापरकर्त्यांनी बीएसएनएलला मोठी पसंती दिली होती. त्यामुळे नावाजलेल्या सर्व टेलिकॉम कंपन्यांना धक्का बसला होता. तर आता पुन्हा बीएसएनएलने नवा प्लॅन अस्तित्वात आणला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.



सध्या अनेकांना इंटरनेटच्या जास्त वापरामुळे काहीवेळा मोबाइल प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा देखील कमी पडतो. त्यामुळे बीएसएनएलने नवा रिचार्ज प्लान उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना दर महिन्याला 5000GB डेटा मिळू शकणार आहे.



काय आहे रिचार्ज प्लॅन?


बीएसएनएलने ब्रॉडबँड प्लॅन (BSNL Broadband Plan) आणला आहे. यामुळे ग्राहकांना कमी खर्चात हाय स्पीड अनलिमिटेड डेटा मिळू शकणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 300Mbps चा स्पीड मिळतो. याचा अर्थ, आपण कोणत्याही तणावाशिवाय अवजड काम सहजपणे करू शकता.


फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन


बीएसएनएलचा हा ब्रॉडबँड प्लॅन, जो जिओ एअरटेलचे टेन्शन वाढवत आहे, सोबतच उत्तम OTT फायदेही देतो. या कंपनीमध्ये, ग्राहकांना डिस्ने प्लस हॉटस्टार, लायन्स गेट, वूट ॲप, सोनी लिव्ह प्रीमियम, झी 5 प्रीमियम, हंगामा तसेच शेमारू मी आणि याप टीव्हीसह अनेक ॲप्सचे विनामूल्य सदस्यता मिळते. याचा अर्थ असा की, बीएसएनएल तुम्हाला अनलिमिटेड डेटा देत नाही तर ओटीटीच्या स्वतंत्र खर्चातही बचत करत आहे.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )