BSNLचा जिओ, एअरटेलला पुन्हा झटका! 'या' प्लॅनद्वारे ग्राहकांना मिळणार दरमहा 5000GB डेटा

  95

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी जिओ मागोमाग एअरटेल, व्हिआयसह इतर कंपन्यांनी मोबाईल रिचार्जचे दर वाढवल्यानंतर ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली होती. यादरम्यान बीएसएनएल (BSNL) या टेलिकॉम कंपनीने रिचार्जचे दर कमी केल्याने जिओ, एअरटेल, व्हिआय कंपनीच्या वापरकर्त्यांनी बीएसएनएलला मोठी पसंती दिली होती. त्यामुळे नावाजलेल्या सर्व टेलिकॉम कंपन्यांना धक्का बसला होता. तर आता पुन्हा बीएसएनएलने नवा प्लॅन अस्तित्वात आणला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.



सध्या अनेकांना इंटरनेटच्या जास्त वापरामुळे काहीवेळा मोबाइल प्लॅनमध्ये उपलब्ध डेटा देखील कमी पडतो. त्यामुळे बीएसएनएलने नवा रिचार्ज प्लान उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ग्राहकांना दर महिन्याला 5000GB डेटा मिळू शकणार आहे.



काय आहे रिचार्ज प्लॅन?


बीएसएनएलने ब्रॉडबँड प्लॅन (BSNL Broadband Plan) आणला आहे. यामुळे ग्राहकांना कमी खर्चात हाय स्पीड अनलिमिटेड डेटा मिळू शकणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 300Mbps चा स्पीड मिळतो. याचा अर्थ, आपण कोणत्याही तणावाशिवाय अवजड काम सहजपणे करू शकता.


फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन


बीएसएनएलचा हा ब्रॉडबँड प्लॅन, जो जिओ एअरटेलचे टेन्शन वाढवत आहे, सोबतच उत्तम OTT फायदेही देतो. या कंपनीमध्ये, ग्राहकांना डिस्ने प्लस हॉटस्टार, लायन्स गेट, वूट ॲप, सोनी लिव्ह प्रीमियम, झी 5 प्रीमियम, हंगामा तसेच शेमारू मी आणि याप टीव्हीसह अनेक ॲप्सचे विनामूल्य सदस्यता मिळते. याचा अर्थ असा की, बीएसएनएल तुम्हाला अनलिमिटेड डेटा देत नाही तर ओटीटीच्या स्वतंत्र खर्चातही बचत करत आहे.

Comments
Add Comment

डिजिटल भारत: देशात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या १०० कोटींच्या पुढे

नवी दिल्ली: भारताने डिजिटल जगात एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल

New GST Rates : दिवाळी धमाका ऑफर सरकारकडूनच! आता खर्च कमी, मजा जास्त; पनीर, दूध, औषधं आणि शालेय साहित्य जीएसटीमुक्त, ही संपूर्ण यादी वाचा

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दिवाळीच्या

"वचन पूर्ण केलं" GST कर रचनेच्या बदलावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: वाढणाऱ्या महागाईचा फटका प्रत्येक देशवासीयांना बसत आहे. त्यात सणासुदीच्या काळांत वाढणारे कर

'या' अल्पसंख्यांकांना पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

नवी दिल्ली : पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथून भारतात आलेल्या हिंदू, शीख, ख्रिस्ती, बौद्ध, जैन आणि पारशी

चेक बाउन्स प्रकरणातील दोषीला तुरुंगवास टाळता येणार

नवी दिल्ली : चेक बाउन्सच्या (चेक वटणं) गुन्ह्यात दोषी ठरलेल्या व्यक्तीला सुनावण्यात आलेली तुरुंगवासाची शिक्षा

नेपाळ, भूतानमधील नागरिकांना व्हिसा-पासपोर्टची गरज नाही!

नवी दिल्ली : नेपाळ आणि भूतानमधील नागरिकांना रस्ते किंवा हवाई मार्गाने भारतात प्रवेश करताना पासपोर्ट किंवा