काँग्रेसने डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडली नाही - एकनाथ शिंदे

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या चिरस्मारकासाठी गिरगाव चौपाटीच्या जागेची मागणी करण्यात आली होती. मात्र ती जागा तत्कालिन काँग्रेस सरकारने दिली नाही. अखेर दादर चौपाटीजवळील बाँबे पोर्ट ट्रस्टच्या जागेवर हे स्मारक उभे राहिले. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकराना सातत्याने अपमानित केलेच पण मृत्यूनंतरही त्यांची अवहेलना करण्याची संधी सोडली नाही असा घणाघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

याबाबतची वस्तुस्थिती मांडताना, महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य डॉ. योगिराज बागुल यांनी त्यांच्या 'आठवणीतले बाबासाहेब' या ग्रंथामध्ये ही बाब नमूद केली असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या म्हणण्याला पुष्टी देताना, शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या 'जनता' या नियतकालिकाच्या ७ जुलै १९३४ रोजीच्या अंकामध्ये काँग्रेस ही भांडवलदार आणि जमीनदारांची संस्था असल्याचा उल्लेख असल्याचे दाखवून दिले.




ती एनकेन प्रकारे त्यांचे हितसंबंध आणि त्यांची हुकूमत टिकवून ठेवण्यासाठी काम करणारी संस्था आहे असे मत बाबासाहेबांनीच या पुस्तकात व्यक्त केले असल्याचे दाखवून दिले. महायुती सरकारला डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधानाबद्दलचे प्रेम अन्य कुणी शिकवण्याची गरज नसल्याचे सांगितले. काँग्रेसचे दलित बांधवांविषयी कायमच दुटप्पीपणाचे धोरण राहिले आहे. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच काँग्रेस हे जळते घर आहे त्यापासून दूर राहा असे सांगितले असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

काँग्रेसने सातत्याने बाबासाहेबांचा अपमान केला आहे. दोन वेळा कटकारस्थान करून काँग्रेसनेच बाबासाहेबांना निवडणुकीत हरवलं होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री असूनही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला? याची कारणे तपासली मग काँग्रेसने बाबासाहेबांना कसे अपमानित केले ते आपल्या लक्षात येईल असे शिंदे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा