PM Modi : मोदींचा करिष्माच; तर राहुल गांधी पुन्हा फेल! सर्व्हेतील निष्कर्ष

नवी दिल्ली : सलग तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत सत्ता स्थापन केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा करिष्मा अजिबात कमी झालेला नाही, असे निरीक्षण 'द मॅट्रिझ'च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तसेच महाराष्ट्र व हरियाणा या दोन राज्यांत भाजपाने मिळवलेल्या यशात देखिल मोदी यांच्या लोकप्रियतेचा मोठा वाटा होता, असेही यात नमूद करण्यात आले आहे.


यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले होते. पण प्रत्यक्षात २४० जागांवरच समाधान मानावे लागले होते. यानंतर पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा कमी झाल्याची टीका विरोधकांनी सुरु केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दणदणीत यश मिळाले.


या दोन राज्यातील निवडणुकांमध्ये कोणते घटक प्रभावी ठरले, यासंदर्भात 'द मॅट्रिझ'ने तपशीलवार सर्वेक्षण केले.



महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर २५ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत महाराष्ट्रासह हरियाणात हे सर्वक्षण करण्यात आले. यात महाराष्ट्रातील ७६,८३० तर हरियाणातील ५३,६४७ मतदारांचा कौल घेण्यात आला.


दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१४ मध्ये देश पातळीवर भाजपाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. सलग दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाने स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला होता. यंदा मात्र भाजपाला २४० जागाच जिंकता आल्या. असे असूनही हरियाणा व महाराष्ट्रात मोदींना मोठा जनाधार असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. मोदींच्या लोकप्रियतेत वाढ झाली असल्याचे महाराष्ट्रातील ५५ टक्के, तर हरियाणातील ५३ टक्के मतदारांनी सर्वेक्षणात नमूद केले.


काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यघटनेचा मुद्दा उपस्थित करत भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता. 'बहुमताच्या जोरावर भाजपा राज्यघटनेत बदल करणार' असा दावा काँग्रेसने केला होता. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या काही टप्प्यांत या प्रचाराचा काहीसा प्रभाव पडला होता. पण हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत राहुल गांधी व काँग्रेसच्या या दाव्याकडे मतदारांनी पाठ फिरवली. राज्यघटनेतील बदल, वादग्रस्त शेतकरी कायदे व कुस्तीपटूंचे आंदोलन या मुद्यांभोवती काँग्रेसने केलेल्या प्रचाराचा दोन्ही राज्यांत उपयोग झाला नाही.


पंतप्रधान मोदी यांना सक्षम पर्याय म्हणून राहुल गांधी यांच्याकडे मतदार पाहत नाही, असे या सर्वेक्षणातून समोर आले.


'एक है तो सेफ है' या घोषणेभोवती भाजपाने प्रचाराची रणनीती आखली होती. दोन्ही राज्यांत मतदारांवर याचा प्रभाव पडला. मोदींच्या नेतृत्त्वाला केंद्रस्थानी ठेवत केलेल्या प्रचाराला मतदारांनी प्रतिसाद दिला. दुसरीकडे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद व ठोस नेतृत्त्वाचा अभाव याचा फटका पक्षाला बसला.


हरियाणामध्ये भाजपाने तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडून नेतृत्त्वाची जबाबदारी नव्या चेहऱ्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. यामुळे मतदारांचा भाजपाकडे कल वाढला, असे सर्वेक्षणातून निदर्शनास आले. महाराष्ट्रातही राज्य पातळीवरील भक्कम नेतृत्त्व आणि सक्रिय पक्ष संघटना याचा भाजपाच्या यशात मोठा वाटा होता.


त्याचवेळी महाराष्ट्र व हरियाणामध्ये सरकारने सुरु केलेल्या सर्वसमावेशक योजनांचा मोठा फायदा भाजपाला झाला. कृषी, पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास यांना बळ देणाऱ्या योजनांमुळे मतदारांचा कौल भाजपाला मिळाला, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

Comments
Add Comment

Kerala Massive Explosion : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड गावात फटाक्यांच्या गोदामात भीषण आग आणि स्फोटाची घटना घडली आहे. या

Bihar Politics : नारी शक्ती अधिनियमाला विरोध करणाऱ्या खासदाराचे धक्कादायक वक्तव्य, महिलांचे राजकीय करिअर बेडपासून...

बिहारमधील एका अपक्ष खासदाराच्या वक्तव्याने संपूर्ण राजकारण तापलं आहे. नुकताच त्यांनी राजकारणातील महिला आणि

Tariff Refund : अमेरिकेचा मोठा निर्णय : भारताला मिळू शकतो तब्बल ₹1 लाख कोटींचा टॅरिफ रिफंड!

अमेरिकेत सुरू असलेल्या व्यापार चर्चांदरम्यान भारतासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे

US-India Trade Deal : अमेरिका-भारत व्यापार करारासाठी भारतीय शिष्टमंडळ या आठवड्यात वॉशिंग्टनला भेट देणार

भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार करारासंदर्भातील प्रयत्न आता अंतिम आणि सर्वात महत्त्वाच्या

Manipur Earthquake : मणिपुरमध्ये ५.२ रिश्टर तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट

मणिपुरच्या अनेक भागांमध्ये आज म्हणजेच मंगळवार २१ एप्रिल रोजी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर

Operation Sindoor : “मर्यादा ओलांडू नका, भारत विसरत नाही”; पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्ताने भारतीय लष्कराचे सूचक ट्विट

- भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन सिंदूर’ची आठवण मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानी