Hair Care : थंडीत केस गळत आहेत? तर करा हे उपाय

मुंबई: थंडीचे दिवस सुरू झालेत त्यासोबतच केसगळतीही मोठ्या प्रमाणात होत आहे. येथे आम्ही काही तुम्हाला उपाय सांगत आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही केस गळण्यापासून रोखू शकतो आणि चमकदार बनवू शकता. जसजशी थंडी वाढू लागते तसतशा अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. यामुळे त्वचा कोरडी होणे, रॅशेस आणि सगळ्यात मोठी समस्या केस गळतीची होते.


थंड हवा आणि घराच्या आत हीटिंगमुळे केसांचे आरोग्य बिघडते. यामुळे ते निस्तेज होतात तसेच गळू लागतात. दरम्यान, थंडीच्या दिवसांत जर तुमचे केस गळत असतील तर काही जुने उपाय वापरून तुम्ही केसगळती रोखू शकता.


आवळ्याचा रस हा अनेक औषधीय गुणांसाठी ओळखला जातो. आवळ्याच्या रसामुळे तुमचे केस धुतल्यानंतर मुलायम आणि चमकदार होतात.


केसांची वाढ होण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल आणि आवळ्याचा रस वापरू शकता. एका वाटीत थोडे बदामाचे तेल गरम करा आणि त्यात आवळ्याचा रस मिसळा.


हे मिश्रण स्काल्पवर गोलाकार पद्धतीने हळूहळू मालिश करा. यामुळे केसांच्या मुळांकडे व्यवस्थित लागेल. धुण्याच्या आधी १-२ तास हे मिश्रण लावा.


जर तुमचे केस निस्तेज झाले असतील तर ते सांभाळणे कठीण होते. यासाठी कोरफडीचे जेल वापरू शकता. नारळाच्या तेलामुळेही केसांना चांगले कंडिशनिंग मिळते. तसेच केस मजबूत होण्यास मदत होते.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे