Sudhir Rasal : ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

  124

मुंबई : प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य अकादमीने २० भाषांमध्ये वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये मराठीत ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.


साहित्य अकादमीने २१ भाषांमध्ये ८ काव्यंसग्रह, तीन कादंबरी, २ लघुकथा संग्रह, ३ साहित्य समीक्षक, १ नाटक आणि एक संशोधनासाठी पुरस्कार दिला. साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. ८ मार्च २०२५ रोजी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.



विविध भाषांमधील साहित्य पुरस्कार जाहीर


आसामी भाषेत समीर तांती, बोडो-अरोन राजा, इंग्लिश -इस्टरिन किर, गुजराती - दिलीप झवेरी, हिंदी - गगन गिल, कन्नड-केव्ही नारायणा, काश्मिरी-सोहन कौल, कोंकणी-मुकेश थाली, मैथिली - महेंद्र मलांगिया, मल्याळम - जयकुमार, मणिपूरी - हाओबम सत्यवती देवी, मराठी-सुधीर रसाळ, नेपाळी - युवा बराल.



कोण आहेत सुधीर रसाळ...


डॉक्टर सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षणात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधीर रसाळ हे सध्या ९१ वर्षांचे असून या वयातही अलीकडेच त्यांच्या १६ व्या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच प्राध्यापक म्हणूनही त्यांची चांगली ओळख आहे. त्यांनी शासकीय कला महाविद्यालय आणि मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

Comments
Add Comment

मुख्याध्यापक लंके यांच्या बदलीविरोधात आंदोलन, शाळेला कुलुप लावण्याचा पालकांचा इशारा

नगर (प्रतिनिधी) – रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी लंके यांची

बीड विनयभंग प्रकरण: आरोपी विजय पवारवर आणखी गंभीर आरोप; एसआयटी चौकशीचे आदेश

बीड : बीड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार