Onion price : कांद्याचे दर दोन हजार रुपयांनी घसरले; शेतकरी हवालदिल!

  251

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत १०-१५ दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपयांचा सरासरी दर (Onion price) होता. उच्चांकी दर सात हजारांपर्यंत मिळत होता. पण, आता आवक तेवढीच असताना देखील कांद्याचे सरासरी दर तब्बल दोन हजार रुपयांनी घसरल्याची स्थिती पहायला मिळत आहे. कांद्याला १८०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.



सोलापूर बाजार समितीत ४३० गाड्या कांद्याची आवक होती. ४३ हजार ७७ क्विंटल कांद्यापैकी अवघा पाच क्विंटल कांदा चार हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. उर्वरित ४३ हजार ६८ क्विंटल कांद्याला सरासरी दर अठराशे रुपयांपर्यंतच मिळाल्याचे दिसून आले. बाजार समितीत कांद्याच्या विक्रीतून पावणेआठ कोटींची उलाढाल झाली.


एवढीच आवक असताना मागील दहा दिवसांपूर्वी ११ कोटींपर्यत उलाढाल होती. दरात मोठी घसरण (Onion price) झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाळ्यात जागेवरच खराब झालेला कांदा काढून शेतकऱ्यांनी नवीन कांद्याची लागवड केली. त्यातून चार पैसे हाती पडतील, नुकसान भरून निघेल हा त्यामागील हेतू आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या