Onion price : कांद्याचे दर दोन हजार रुपयांनी घसरले; शेतकरी हवालदिल!

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत १०-१५ दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल साडेतीन हजार रुपयांचा सरासरी दर (Onion price) होता. उच्चांकी दर सात हजारांपर्यंत मिळत होता. पण, आता आवक तेवढीच असताना देखील कांद्याचे सरासरी दर तब्बल दोन हजार रुपयांनी घसरल्याची स्थिती पहायला मिळत आहे. कांद्याला १८०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.



सोलापूर बाजार समितीत ४३० गाड्या कांद्याची आवक होती. ४३ हजार ७७ क्विंटल कांद्यापैकी अवघा पाच क्विंटल कांदा चार हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. उर्वरित ४३ हजार ६८ क्विंटल कांद्याला सरासरी दर अठराशे रुपयांपर्यंतच मिळाल्याचे दिसून आले. बाजार समितीत कांद्याच्या विक्रीतून पावणेआठ कोटींची उलाढाल झाली.


एवढीच आवक असताना मागील दहा दिवसांपूर्वी ११ कोटींपर्यत उलाढाल होती. दरात मोठी घसरण (Onion price) झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाळ्यात जागेवरच खराब झालेला कांदा काढून शेतकऱ्यांनी नवीन कांद्याची लागवड केली. त्यातून चार पैसे हाती पडतील, नुकसान भरून निघेल हा त्यामागील हेतू आहे.

Comments
Add Comment

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन