Encounter : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षादलाची मोठी कारवाई, ५ दहशतवादी ठार

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षारक्षक दलाच्या जवानांनी मोठी कारवाई करताना ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. येथे सुरक्षारक्षक दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात मोठी चकमक(Encounter) झाली. यात ५ दहशतवादी ठार झाले. तर या चकमकीत २ जवानही जखमी झालेत. चकमकीनंतर आता सुरक्षादलाचे जवान या ठिकाणी सर्च ऑपरेशन करत आहेत. दहशतवादी आणि सुरक्षादलाच्या जवानांमधील ही चकमक कुलगाम जिल्ह्याच्या बेहिबाग पीएसच्या कद्देर गावात झाली. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. याच्या आधारावर जवानांनी कुलगाममध्ये संयुक्त ऑपरेशन सुरू केले. जवानांना या ठिकाणी संशयित हालचाली आढळल्या. दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबारही केला. याला जवानांनी चोख प्रतुत्तरही दिले.


गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना समोर आल्या आहेत. यात सुरक्षारक्षकांनी खोऱ्यामध्ये दहशतवादविरोधी ऑपरेशनचा वेग वाढवला आहे. दोन महिन्यांआधी २८ ऑक्टोबरला जम्मूच्या अखनूर भागात सुरक्षारक्षत दलाच्या जवानांनी ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. तेव्हा जवानांच्या ताफ्यावर हल्ला जाला होता. यानंतर सुरक्षारक्षकांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या ऑपरेशनदरम्यान तीन दहशतवादी ठार करण्यात आले होते. मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडे हत्यारे आणि दारूगोळा सापडला होता.

Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या