Encounter : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षादलाची मोठी कारवाई, ५ दहशतवादी ठार

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षारक्षक दलाच्या जवानांनी मोठी कारवाई करताना ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. येथे सुरक्षारक्षक दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात मोठी चकमक(Encounter) झाली. यात ५ दहशतवादी ठार झाले. तर या चकमकीत २ जवानही जखमी झालेत. चकमकीनंतर आता सुरक्षादलाचे जवान या ठिकाणी सर्च ऑपरेशन करत आहेत. दहशतवादी आणि सुरक्षादलाच्या जवानांमधील ही चकमक कुलगाम जिल्ह्याच्या बेहिबाग पीएसच्या कद्देर गावात झाली. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. याच्या आधारावर जवानांनी कुलगाममध्ये संयुक्त ऑपरेशन सुरू केले. जवानांना या ठिकाणी संशयित हालचाली आढळल्या. दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबारही केला. याला जवानांनी चोख प्रतुत्तरही दिले.


गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना समोर आल्या आहेत. यात सुरक्षारक्षकांनी खोऱ्यामध्ये दहशतवादविरोधी ऑपरेशनचा वेग वाढवला आहे. दोन महिन्यांआधी २८ ऑक्टोबरला जम्मूच्या अखनूर भागात सुरक्षारक्षत दलाच्या जवानांनी ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. तेव्हा जवानांच्या ताफ्यावर हल्ला जाला होता. यानंतर सुरक्षारक्षकांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या ऑपरेशनदरम्यान तीन दहशतवादी ठार करण्यात आले होते. मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडे हत्यारे आणि दारूगोळा सापडला होता.

Comments
Add Comment

अशी झाली जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे चोरी !

पॅरिस : जगप्रसिद्ध लूव्ह्र संग्रहालय येथे घडलेल्या चोरीने जगभरात खळबळ उडाली आहे. सकाळी संग्रहालय उघडलेलं असताना

कर्नूल बस अपघात : स्मार्टफोन बॅटरी फुटल्यामुळे आग, १९ प्रवासी मृत्युमुखी

कर्नूल : आंध्र प्रदेशमधील कर्नूलमध्ये शुक्रवारी सकाळी झालेल्या बस अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात

भारताचा पाकिस्तान सीमेवर युद्धाभ्यास

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने मोठ्या युद्धाभ्यासाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत भारतीय सैन्य

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

Eknath Shinde in Delhi : मोठी ब्रेकिंग! मध्यरात्री उपमुख्यमंत्री शिंदेंची अचानक 'दिल्लीवारी'; महायुतीत नेमकी कोणती नवी 'राजकीय घडामोड'? कारण आलं समोर...

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्री तातडीने दिल्ली गाठल्यामुळे (Delhi Visit) राजकीय वर्तुळात

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात