Encounter : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षादलाची मोठी कारवाई, ५ दहशतवादी ठार

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षारक्षक दलाच्या जवानांनी मोठी कारवाई करताना ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. येथे सुरक्षारक्षक दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात मोठी चकमक(Encounter) झाली. यात ५ दहशतवादी ठार झाले. तर या चकमकीत २ जवानही जखमी झालेत. चकमकीनंतर आता सुरक्षादलाचे जवान या ठिकाणी सर्च ऑपरेशन करत आहेत. दहशतवादी आणि सुरक्षादलाच्या जवानांमधील ही चकमक कुलगाम जिल्ह्याच्या बेहिबाग पीएसच्या कद्देर गावात झाली. दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला.


मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. याच्या आधारावर जवानांनी कुलगाममध्ये संयुक्त ऑपरेशन सुरू केले. जवानांना या ठिकाणी संशयित हालचाली आढळल्या. दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबारही केला. याला जवानांनी चोख प्रतुत्तरही दिले.


गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना समोर आल्या आहेत. यात सुरक्षारक्षकांनी खोऱ्यामध्ये दहशतवादविरोधी ऑपरेशनचा वेग वाढवला आहे. दोन महिन्यांआधी २८ ऑक्टोबरला जम्मूच्या अखनूर भागात सुरक्षारक्षत दलाच्या जवानांनी ३ दहशतवाद्यांना ठार केले होते. तेव्हा जवानांच्या ताफ्यावर हल्ला जाला होता. यानंतर सुरक्षारक्षकांनी या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या ऑपरेशनदरम्यान तीन दहशतवादी ठार करण्यात आले होते. मारले गेलेल्या दहशतवाद्यांकडे हत्यारे आणि दारूगोळा सापडला होता.

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन