Water Transport : समुद्रातील गाळाचा जलवाहतुकीला फटका!

  55

नवी मुंबई : मुंबई येथे जलद प्रवास होण्यासाठी उरण येथील मोरा या ठिकाणाहून जलवाहतूक (Water Transport) मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र सध्या या जलवाहतूकीचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.


मोरा येथील समुद्र किनारी धक्क्यालगत असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे प्रवासी बोटी दुसऱ्या ठिकाणी पोहचण्यासाठी विलंब होत आहे. प्रवासी बोटीमध्ये चाकरमान्यांसह अनेक कर्मचारीही प्रवास करतात. मात्र कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालयात पोहोचणे शक्य होत नसल्याने पगार कपातीला सामोरे जावे लागत आहे.



दरम्यान, यामुळे प्रवासी त्रस्त असून प्रवाशांकडून जलवाहतुक व औद्योगिक सहकारी संस्था, भाऊचा धक्का, मुंबई यांच्याकडे पत्रव्यवहार करत गाळ काढण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच गाळ अत्याधुनिक पद्धतीने काढल्यास जास्त काळ राहील अन्यथा बंदराची लांबी वाढवावी, जेणे करून प्रवाशांचा थोडा मानसिक त्रास कमी होण्यास मदत होईल, असेही प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.



जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या



  • मोरा बंदरात चिखल जास्त असल्याने जलवाहतुक व औद्दोगिक सहकारी संस्थेच्या बोटी ४ ते ५ तास बंद असतात आणि ते ही ५ ते ६ दिवस.

  • खासगी कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना वेळेवर कामावर पोहचता येत नाही. महिन्यातून ३ ते ४ लेट मार्क लागतात.

  • महिन्यातुन दोनदा म्हणजेच आमावस्या व पोर्णिमेला बोटिंचे वेळापत्रक बदलते.

  • भाऊच्या धक्यावरून सुटलेल्या बोटी काहीवेळा मोरा बंदरात चिखलात अडकतात, त्यामुळे वेळेवर पोहचणाऱ्या प्रवाशांमध्ये व बोट चालकांमध्ये कधीतरी शाब्दीक वाद विवाद होतात.

  • वेळपत्रक चुकल्याने बस, ट्रेन मिळत नाही, जास्त खर्च करून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत