Chhagan Bhujbal : मंत्रिपदावर नसलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत मागासवर्गींयासाठी लढणार!

Share

रस्त्यावर लढाई घेऊन जाणार असल्याचा छगन भुजबळांचा इशारा

नाशिक : प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही, मंत्रिपदे किती वेळा आली आणि किती वेळा गेली. विरोधी पक्षातही बसलो, त्याचे वाईट वाटले नाही. पण, जी अवहेलना झाली, त्याचे शल्य मनात डाचतेय. ओबीसींनी इतके सारे दिल्यानंतरही ओबीसींवर अन्याय कशासाठी, त्यामागचा हेतू नेमका का? कुणासाठी हे सगळे? असा सवाल करत मी आता अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. ओबीसींची ही लढाई आता रस्त्यावर घेऊन जाणार असल्याची भूमिका छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जाहीर केली आहे.

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली. त्यांनी आपण लगेचच काही निर्णय घेणार नाही. घाईघाईत कोणताही निर्णय न घेता विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अजून बाकी आहे, याची आठवण करुन देत भुजबळांनी इशारा दिला. विधानसभेत लाडक्या बहिणींबरोबरीनेच ओबीसी समाजाने महायुतीला मतदान केले. त्यातूनच महायुतीला यश मिळाले. हे विसरु नका. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार असल्याची भूमिका भुजबळांनी जाहीर केली आहे.

भुजबळ म्हणाले, मंत्रिपदावर नसलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत मागासवर्गींयासाठी मी लढेल. आपल्या प्रश्नांसाठी एकजुठीने उभे राहा, पुढे आणखी काही संकटं येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर लढाई होणार. कदाचित आपल्यावर वरवंटा चालवतील. तुम्ही लढायला तयार राहा, असे आवाहन भुजबळांनी केले. त्यामळे घाईघाईत निर्णय नको, विचारपूर्क निर्णय घेऊ असेही भुजबळ म्हणाले.

ओबीसीतून आरक्षण नको एवढाच विरोध होता

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला आपला कधी विरोध नव्हता. आपला विरोध केवळ आमच्या ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नका, एवढाच होता. आरक्षण आरक्षण काय आहे, कशासाठी आहे. आरक्षणाने पाच वर्षात सर्वच प्रश्न सुटत नाही. सर्व प्रश्न असे सुटले असते तर आरक्षणाची गरज लागली नसती. दलित, आदिवासींना मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. कितीतरी दलित आदिवासी समाजातील एसपी, कलेक्टर सापडतील असेही ते म्हणाले. परंतू आजही आपण झोपडपट्ट्यांत गेलो तर दलित आणि आदिवसीच सापडतात. पण भ्रम करून दिला की आरक्षण दिलं म्हणजे घरावर सोन्याचे कौल दिली, पण तसे नाही असेही भुजबळ यांनी सांगितले.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

32 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

1 hour ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

5 hours ago