Chhagan Bhujbal : मंत्रिपदावर नसलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत मागासवर्गींयासाठी लढणार!

  115

रस्त्यावर लढाई घेऊन जाणार असल्याचा छगन भुजबळांचा इशारा


नाशिक : प्रश्न माझ्या मंत्रिपदाचा नाही, मंत्रिपदे किती वेळा आली आणि किती वेळा गेली. विरोधी पक्षातही बसलो, त्याचे वाईट वाटले नाही. पण, जी अवहेलना झाली, त्याचे शल्य मनात डाचतेय. ओबीसींनी इतके सारे दिल्यानंतरही ओबीसींवर अन्याय कशासाठी, त्यामागचा हेतू नेमका का? कुणासाठी हे सगळे? असा सवाल करत मी आता अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार आहे. ओबीसींची ही लढाई आता रस्त्यावर घेऊन जाणार असल्याची भूमिका छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जाहीर केली आहे.


मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यांनी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भूमिका जाहीर केली. त्यांनी आपण लगेचच काही निर्णय घेणार नाही. घाईघाईत कोणताही निर्णय न घेता विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले आहे.



स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका अजून बाकी आहे, याची आठवण करुन देत भुजबळांनी इशारा दिला. विधानसभेत लाडक्या बहिणींबरोबरीनेच ओबीसी समाजाने महायुतीला मतदान केले. त्यातूनच महायुतीला यश मिळाले. हे विसरु नका. मी संपूर्ण राज्यात जाणार आहे. मी अनेक राज्यातून जाणार आणि ओबीसींचा एल्गार पुकारणार असल्याची भूमिका भुजबळांनी जाहीर केली आहे.


भुजबळ म्हणाले, मंत्रिपदावर नसलो तरी शेवटच्या श्वासापर्यंत मागासवर्गींयासाठी मी लढेल. आपल्या प्रश्नांसाठी एकजुठीने उभे राहा, पुढे आणखी काही संकटं येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावर लढाई होणार. कदाचित आपल्यावर वरवंटा चालवतील. तुम्ही लढायला तयार राहा, असे आवाहन भुजबळांनी केले. त्यामळे घाईघाईत निर्णय नको, विचारपूर्क निर्णय घेऊ असेही भुजबळ म्हणाले.



ओबीसीतून आरक्षण नको एवढाच विरोध होता


छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला आपला कधी विरोध नव्हता. आपला विरोध केवळ आमच्या ओबीसीतून त्यांना आरक्षण देऊ नका, एवढाच होता. आरक्षण आरक्षण काय आहे, कशासाठी आहे. आरक्षणाने पाच वर्षात सर्वच प्रश्न सुटत नाही. सर्व प्रश्न असे सुटले असते तर आरक्षणाची गरज लागली नसती. दलित, आदिवासींना मोठ्या प्रमाणात आरक्षण आहे. कितीतरी दलित आदिवासी समाजातील एसपी, कलेक्टर सापडतील असेही ते म्हणाले. परंतू आजही आपण झोपडपट्ट्यांत गेलो तर दलित आणि आदिवसीच सापडतात. पण भ्रम करून दिला की आरक्षण दिलं म्हणजे घरावर सोन्याचे कौल दिली, पण तसे नाही असेही भुजबळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'एआय'चा वापर

रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे

लंडनमध्ये भारतीय रेस्टॉरंटला आग; पाच जण जखमी

लंडन: लंडनमध्ये एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावल्याची धक्कादायक घटना समोर

Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला ‘या’ राशी आहेत सर्वाधिक प्रिय, त्यांना मिळणार गुडन्यूज

मुंबई: गणेश चतुर्थी हा सण लवकरच येत आहे आणि देशभरातील गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

Vastu Tips: कात्री वापरताना 'या' चुका टाळा, नाहीतर घरात येईल नकारात्मकता आणि गरिबी!

मुंबई : वास्तुशास्त्रानुसार, घरात प्रत्येक वस्तू ठेवण्याचं आणि वापरण्याचं एक योग्य स्थान आणि पद्धत असते. जर या

स्वातंत्र्यदिनी युक्रेनचा रशियाच्या अण्वस्त्र प्रकल्पावर ड्रोन हल्ला; मोठा स्फोट होऊन आग

मॉस्को: युक्रेनने रशियाच्या ऊर्जा प्रकल्पांवर पुन्हा एकदा मोठा ड्रोन हल्ला केला आहे. युक्रेनच्या स्वातंत्र्य