Crime News : लग्नांचा खेळ! दोघींशी लग्न, तिसरीसोबत फोडली लग्नाची सुपारी आणि चौथीसोबत सुरु लग्नाची बोलणी

नेरळ : प्रख्यात लेखक आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या 'तो मी नव्हेच' या अजरामर नाटकातील मुख्य पात्र असलेल्या 'लखोबा लोखंडे'च्या भूमिका सत्यात उतरली असल्याचे समोर आली आहे. रत्नागिरीमधील एका माणसाने दोघींशी लग्न, तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडून चौथीसमवेत लग्नाची बोलणी करणाऱ्या आरोपीला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. विशेषत: यामध्ये एक महिला पोलिस कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांचे लग्न जुळत नाही किंवा ज्यांचे वय आधिक झाले आहे अशा महिलांसोबत ओळख निर्माण करून आरोपी योगेश यशवंत हुमने (३३) हा महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचे काम करत होता. आरोपी योगेशने आतापर्यंत अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपी विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी कडक तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.



प्रकरण कसे आले समोर?


कोल्ह्यारे जवळील राहणारी ३४ वर्षीय पीडित विवाहित महिलेने आपल्याच पती विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महिलेने पतिविरोधत मानसिक छळवणूक आणि आर्थिक फसवणूक तसेच पतीचे या आधी लग्र झाले असताना, माझी फसवणूक करून माझ्यासोबत दुसरे लग्न केल्याचे तक्रारीत म्हटले होते. यामधे १५ ते २० लाखाची आर्थिक फसवणूक केल्याचे पीडित महिलने सांगितले होते. याबाबत तक्रारदार महिलेच्या सांगण्यावरून पती योगेश यशवंत हुमने या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या