Crime News : लग्नांचा खेळ! दोघींशी लग्न, तिसरीसोबत फोडली लग्नाची सुपारी आणि चौथीसोबत सुरु लग्नाची बोलणी

  87

नेरळ : प्रख्यात लेखक आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या 'तो मी नव्हेच' या अजरामर नाटकातील मुख्य पात्र असलेल्या 'लखोबा लोखंडे'च्या भूमिका सत्यात उतरली असल्याचे समोर आली आहे. रत्नागिरीमधील एका माणसाने दोघींशी लग्न, तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडून चौथीसमवेत लग्नाची बोलणी करणाऱ्या आरोपीला नेरळ पोलिसांनी अटक केली आहे. विशेषत: यामध्ये एक महिला पोलिस कॉन्स्टेबलचा देखील समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलांचे लग्न जुळत नाही किंवा ज्यांचे वय आधिक झाले आहे अशा महिलांसोबत ओळख निर्माण करून आरोपी योगेश यशवंत हुमने (३३) हा महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे लुटण्याचे काम करत होता. आरोपी योगेशने आतापर्यंत अनेक मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपी विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी कडक तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.



प्रकरण कसे आले समोर?


कोल्ह्यारे जवळील राहणारी ३४ वर्षीय पीडित विवाहित महिलेने आपल्याच पती विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत महिलेने पतिविरोधत मानसिक छळवणूक आणि आर्थिक फसवणूक तसेच पतीचे या आधी लग्र झाले असताना, माझी फसवणूक करून माझ्यासोबत दुसरे लग्न केल्याचे तक्रारीत म्हटले होते. यामधे १५ ते २० लाखाची आर्थिक फसवणूक केल्याचे पीडित महिलने सांगितले होते. याबाबत तक्रारदार महिलेच्या सांगण्यावरून पती योगेश यशवंत हुमने या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आला.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या