राधाकृष्ण विखे पाटील यांची मंत्रिपदावर वर्णी, श्रीरामपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर श्रीरामपूरमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्यासमोर मोठ्या उत्साहात फटाके फोडून व घोषणाबाजी करत हा आनंद व्यक्त करण्यात आला.


भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रीपदाच्या नियुक्तीची बातमी दूरचित्रवाणी आणि सोशल मीडियावरून समजताच समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. श्रीरामपूर शहरात फटाके फोडत आणि "राधाकृष्ण विखे पाटील की जय" अशा घोषणा देत उत्सव साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमाला भाजपचे शहराध्यक्ष मारुती बिंगले, गणेश मुदगुले, पोपटराव जाधव, भाऊसाहेब पाटील बांद्रे, गणेश राठी, विठ्ठल राऊत, जितेंद्र छाजेड, महेंद्र पटारे, रुपेश हरकल, महिला शहराध्यक्ष पुष्पा हरदास, तालुका महिला अध्यक्ष मंजुश्री ढोकचौळे, पूजा चव्हाण, अक्षदा आछडा, अंजली गायके, विशाल अंभोरे, भैय्या भिसे, विजय आखाडे, बाळासाहेब हरदास, असिफ पोपटिया, रवी पंडित, मिलिंदकुमार साळवे, पंकज करमासे, डॉ. ललित सावंज, योगेश ओझा, सुभोद शिवदेकर, निलेश गीते, प्रसाद बिलदीकर, महेश खरात, पप्पू कुऱ्हे, महेश ढोकचौळे, विजय सदाफळ, मंजित पठाण, सुनील ढोकचौळे, श्रेयस पाठकी, हसराज बतरा, साजिद शेख आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीरामपूरमधील जल्लोषप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी "राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांना आता अधिक वेग येईल," असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन करत, "जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समर्पित भावनेने कार्य करावे," असे सांगितले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी उत्साहात एकजुटीचे आणि विकासाचे वचन घेतले.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे