नोकरीवरून कमी केल्याच्या रागातून तरूणाचा अधिकाऱ्यावर हल्ला

सोलापूर : नोकरीवरून कमी केल्याचा राग मनात धरून एका तरुणाने माळशिरस तालुका पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


माळशिरस तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आबासाहेब हरी पवार (वय ५२, मूळ रा. ढोलेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अमोल बाबासाहेब पाटील असे आरोपीचे नाव आहे. माळशिरस तालुका पंचायत समिती कार्यालयात अमोल पाटील हा नोकरीवर होता. परंतु कर्तव्य कचराईमुळे आणि असमाधानकारक कामामुळे त्याची चौकशी होऊन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्यास नोकरीवरून कमी करण्यात आले होते.


त्यामुळे तो अस्वस्थ होता. त्यातूनच रागापोटी त्याने गट विकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्या शासकीय बंगल्यात घुसून त्यांच्यावर काठीने हल्ला केला. त्यांच्या खिशातील पाच हजारांची रोकडही त्याने बळजबरीने काढून घेतली. तुमच्यामुळे माझी नोकरी गेली, तुम्ही पुन्हा मला कामावर घेतले नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, माळशिरसमध्ये तुम्ही नोकरी कशी करतात तेच बघतो, अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Comments
Add Comment

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

पुण्यात CNG च्या दरात वाढ; या तारखेपासून होणार नवे दर लागू

पुणे : इराण आणि इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशात तेलाच्या गॅसच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरातील वैजापूर रोडवर एलपीजी चोरी प्रकरण उघड; शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाची मोठी कारवाई

मुंबई: शिधावाटप विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने मोठी कारवाई करत एलपीजी गॅस चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०