Kumbh Mela 2024 : पुण्यातून कुंभमेळ्यासाठी धावणार १२ विशेष रेल्वेगाड्या

पुणे : पुण्यावरून कुंभमेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक जातात. रेल्वेचा कमी दरात प्रवास सुरक्षित व चांगला असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह प्रवाशांची कुंभमेळात गर्दी असते. या मेळाव्यात अतिरिक्त गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मध्य रेल्वे विभागाकडून पुणे ते मऊ जंक्शन दरम्यान अतिरिक्त कुंभमेळा विशेष १२ गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.



या विशेष गाड्यांच्या तपशील संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर व www.irctc.co.in या संकेतस्थळावर असून, त्याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे गाडी क्रमांक ०१४५५ पुणे ते मऊ जं. कुंभमेळा स्पेशल ट्रेन पुण्याहून दि. ८, १६, २४ जानेवारी व दि. ६,८ फेब्रुवारीला सकाळी १०.१० वाजता निघेल आणि पुढच्या दिवशी २२.00 वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक ०१४५६ मऊ ते पुणे कुंभमेळा विशेष गाडी मऊ येथून (दि. ९, १७,२५ जानेवारी व दि. ७,०९ फेब्रुवारी रात्री २३.५० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी १५.४५ वाजता पुण्याला पोहोचेल.

Comments
Add Comment

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे