Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! दोन दिवस होणार टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा

ठाणे : ठाणे महानगरपालिकेला (Thane Municipality) मे. स्टेम प्राधिकरणाकडून दुरुस्ती आवश्यक कामे करण्यासाठी पाणीपुरवठ्याचा २४ (Thane Water Supply) तासांसाठी शटडाऊन घेतला आहे. यादरम्यान आज सकाळी ९ वाजता ते उद्या सकाळी ९ वाजेपर्यंत असा २४ तासांचा शटडाऊन घेत ठाणे महानगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेचे नियोजन केले आहे. यावेळी ठाणे शहरात टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना पाणी जपून वापरा, असे आवाहन करण्यात आले आहे.



घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डॉगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा, इत्यादी ठिकाणाचा पाणीपुरवठा आज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद राहील व समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत. उथळसर, रेतीबंदर, कळव्याच्या व मुंब्राचा काही भाग आज रात्री ९ ते शनिवार रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. अशा रितीने पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, शटडाऊन मुळे पाणीपुरवठा पुर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास