Tamilnadu: खाजगी रुग्णालयात मोठी दुर्घटना, आग लागल्याने ७ जणांचा मृत्यू

मुंबई: तामिळनाडूच्या डिंडीगुलमध्ये गुरूवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथील एका खाजगी रुग्णालयात आग लागल्याने ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक मुलगा आणि ३ महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये तिघांची स्थिती गंभीर आहे. या सर्वांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. सूचना मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मिडिया रिपोर्टनुसार रुग्णालयाच्या आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यानंतर लोकांना बाहेर काढून १० सरकारी अॅम्ब्युलन्स आणि ३० खाजगी अॅम्ब्युलन्सच्या मदतीने दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले.



दुर्घटनेप्रकरणी कलेक्टर यांचे विधान


या दुर्घटनेप्रकरणी जिल्हा कलेक्टर यांचे विधान आले आहे. त्यांनी एजन्सीला सांगितले की १० वाजण्याच्या सुमारास एका खाजगी रुग्णालयात आग लागली होती. रुग्णांना वाचवून जवळच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. मृतांबाबतची माहिती डॉक्टरांनी पुष्टी दिल्यानंतरच दिली जाईल.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू