पेण, वाशी, खारेपाट भागांत उन्हाळी भातशेतीचा श्रीगणेशा

शेत तलावाच्या जोरावर दयानंद पाटील यांची बहरली शेती


अलिबाग : पेण तालुक्यातील बहीरामकोटक येथील दयानंद पाटील या तरुणाने स्वत:च्या शेत तलावाच्या पाण्याच्या जोरावर उन्हाळी भातशेती प्रथमच यशस्वी करीत स्थानिक शेतकऱ्यांना बेरोजगारीवर कशी मात करायची हे दाखवून देत अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श उभा केला आहे.



भात हे उष्ण कटिबंधातील पीक असून, त्यास उष्ण व दमट हवामानाची गरज असते. पीकवाढीच्या कालावधीतील सरासरी तपमान २४ ते ३२ अंश से. ग्रे. पोषक असते. चांगले उत्पादन येण्यास हवेतील सरासरी आद्रता ६५ टक्के लागते. या पिकास सरासरी १००० मि.मी.पेक्षा जास्त पावसाची आवश्यकता असते. पुरेसा पाऊस व सिंचनाची सोय उपलब्ध झाल्यास हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते; परंतु या सर्व बाबींवर मात करीत पेण तालुक्यातील बहीरामकोटक येथील दयानंद पाटील या तरुणांने स्वत:च्या शेततलावाच्या पाण्याच्या जोरावर उन्हाळी भातशेती प्रथमच यशस्वी करुन येथील शेतकऱ्यांना बेरोजगारीवर मात कशी करायची हे दाखवून दिले.


दयानंद यांनी यावर्षी प्रथमच दुबार शेती पिकविली आहे. पावसाळी शेतीपेक्षा उन्हाळी शेती बऱ्यापैकी सोपी आहे आणि चांगली येते. पावसाळी शेती करणे आताच्या काळात खूप कठीण आहे. कारण निसर्गाच्या अनियमित बदलांमुळे जून, जुलै महिन्यात पाऊस पडल्यास ठीक, अन्यथा शेतातील पिके करपून जातात, तरी पावसाचा पत्ता नसतो. त्यामुळे उन्हाळी शेती फायद्याची ठरते. खारेपाट भागातील जमीन चिकट असल्याने शेतीमधील पाणी काहीकाळ शेतात टिकून राहते. याचा फायदा घेत उन्हाळी शेती करण्याचे ठरवून ती योग्यरित्या पिकवून चांगल्याप्रकारे रोपे तयार झाले आहे. उन्हाळ्यात भात पिकवणारे बहुतेक प्रदेश नापीक असतात. भात पिकाचे तीन हंगाम आहेत: खरीप, रब्बी आणि उन्हाळी पीक. तांदूळ हे उष्णकटिबंधीय आणि खरीप पीक आहे ज्याला उष्णता, पाऊस आणि श्रम लागतात त्याला उबदार हवामान आवश्यक असते.

Comments
Add Comment

Voter List Update : मतदारयादी पुनरीक्षणाला वेग; ३० जूनपासून बीएलओंची घरभेट

रायगड : भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यात 'विशेष सखोल पुनरीक्षण २०२६' (SIR) मोहीम

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले