मोठी बातमी : अल्लु अर्जुनला अटक; नेमकं कारण काय?

हैदराबाद : दक्षिणेसह बॉलिवूडवर वेगळी छाप उमटवणारा पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या चांगलाच चर्चेत आहे. प्रसिद्ध सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबादेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक केली आहे. हैदराबादमध्ये झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल झाला होता. आज त्याला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आहे.



'पुष्पा २' फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक


हैदराबाद येथील चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जूनला अटक केल्याची माहिती आहे. अल्लू अर्जूनचा पुष्पा २ चित्रपट रिलीज झाला तेव्हा प्रीमियरला अल्लू अर्जून याने हजेरी लावली. 'पुष्पा' येणार म्हणून त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. अल्लू अर्जूनला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड पूर्णपणे उडाली.





हैदराबाद पोलिसांची मोठी कारवाई


अभिनेता अल्लू अर्जूनचा सर्वत्र मोठा चाहतावर्ग आहे. त्याने पुष्पा २ च्या प्रीमियरसाठी हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये हजेरी लावली. या वेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. यावेळी गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यूसुद्धा झाला. या प्रकरणात अल्लू अर्जूनवर मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आता हैदराबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.


Comments
Add Comment

अरावली पर्वतरांगेतील ९० टक्के क्षेत्र संरक्षित

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट नवी दिल्ली : राजस्थानमधील अरावली

नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर दिल्ली उच्च

भारत आणि न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार

२० अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह रोजगाराच्या संधींचे दालन खुले नवी दिल्ली : भारताने जागतिक व्यापाराच्या आघाडीवर

उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक

"दिपू दासच्या मृत्यूला जबाबदार कोण?" बंगालमधील हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोलकाता : भारतीय राजकारणात पश्चिम बंगाल हे नेहमीच संघर्षाचे केंद्र राहिले आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी

माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलातील भरतीत ५० टक्के कोटा

मोदी सरकारचा मोठा निर्णय नवी दिल्ली : माजी अग्निवीरांना आता सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) ५० टक्के कोटा निश्चित