दोन वर्षांत १६० बेस्ट बसेसचा अपघात; ५० मृत्यू, १५० जखमी

मुंबई : सर्वसामान्यांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसेस प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत आहेत. बसेसमध्ये कंत्राटी पद्धतीवर बसेस आल्यानंतर अपघातांचे प्रमाण वाढते आहे. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ या दोन वर्षाच्या कालावधीत बेस्टच्या मालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसेसचे १६० अपघात झाले. या अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला असून १५० जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी कुर्ला येथील अपघातात सात जणांचा जीव गेला असून ४२ जण जखमी झाले आहेत. वाढत्या बेस्ट अपघातामुळे बेस्ट सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.


बेस्ट बसची जगभरात ओळख आहे. सुरक्षित प्रवासासाठी बेस्ट बसला प्रवासी पसंती देतात. मात्र गेल्या दोन वर्षात अपघातांच्या घटना वाढत आहेत. सोमवारी कुर्ल्याच्या हादरवणा-या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातो आहे. मागील दोन वर्षात विविध ठिकाणी झालेल्या घटनांत बेस्ट बसेसच्या १६० अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० जण जखमी झाल्याचे बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.


दादर टीटी खोदादाद सर्कल येथे बेस्ट उपक्रमाच्या तेजस्वीनी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला मागून धडक दिल्याची घटना २ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी चालकाच्या मृत्यूसह ३ जणांचा मृत्यू तर ८ जखमी झाले होते. तर भांडुप येथे ११ ऑगस्ट २०२१ रोजी बेस्ट बस इलेक्ट्रिक कॅबिनवर धडकली होती. या दुर्घटनेत वृद्धाचा मृत्यू तर दोन जखमी झाले होते. २२ जून २०२३ रोजी गिरगाव येथे बेस्ट बसला झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.


बेस्ट उपक्रमाच्या प्रचलित पध्दतीनुसार मोटार अपघात दावा न्यायाधिकरण येथे दाखल करण्यात येतो. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये न्यायाधिकरणाने दिलेल्या निवाड्यानुसार व राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सुमेटाने निकाली काढण्यात आलेल्या एकूण १२ प्रकरणांत जखमींना ९ कोटी ७८ लाग २२ हजार ९७६ रुपये व एकूण ५३ प्रकरणांमध्ये मृतांच्या कायदेशीर वारसांना ११ कोटी २२ लाख ६८ हजार ५६६ रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. कुर्ला येथील बेस्ट अपघातात सात जणांचा जीव गेला आहे. तर ४२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बेस्टने मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तर मुंबई महापालिका बेस्ट प्रशासनाकडून जखमींवरील उपचार मोफत केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

लालबागचा राजा नव्हे... देणगीच्या बाबतीत 'हा' गणपती मुंबईत आघाडीवर, ५ दिवसांत मिळाली १५ कोटींची देणगी

मुंबई: दरवर्षी, मुंबईतील किंग सर्कलमधील गौड सारस्वत ब्राह्मणांच्या (जीएसबी) गणपती मंडळात पाच दिवस गणेशोत्सव

मराठा आरक्षणासंदर्भातील जीआरमुळे ओबीसी समाजाचे अस्तित्व धोक्यात! ओबीसी नेत्यांचे ठरले

न्यायालयीन आणि रस्त्यावरील लढाईसाठी ओबीसी संघटनांची तयारी मुंबई: राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण

गोराई बीचवर भरतीच्या लाटेत बस गेली वाहून, प्रवाशांचं काय झालं पहा...

मुंबई: गोराई बीचवर सोमवारी एक थरारक घटना घडली. एक मिनीबस भरतीमुळे समुद्राच्या लाटेत वाहून गेल्याने घबराट

गुजरातहून आणलेल्या तराफामुळे लालबागच्या राजाचे विसर्जन लांबले, कोळी बांधव संतापले

मुख्यमंत्र्यांकडे केली कठोर कारवाईची मागणी मुंबई: लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याला यंदा विलंब

MahaRERA : बाधित घर खरेदीदारांना दिलासा; ५,२६७ तक्रारी निकाली, भविष्यातील फसवणूक रोखण्यासाठी महारेराचे कठोर पाऊल

मुंबई: राज्यातील घर खरेदीदारांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी महारेरा (MahaRERA) प्रशासनाने मोठी मोहीम हाती

MRVC Vande Metro AC Local : मुंबईकरांनो आता गारेगार प्रवास करा! गर्दीतही आरामदायी अन् वेगवान, मुंबई लोकलमध्ये एसी डबे होणार लवकरच सुरू

मुंबई : मुंबईकरांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर प्रवाशांना अधिक