दोन वर्षांत १६० बेस्ट बसेसचा अपघात; ५० मृत्यू, १५० जखमी

मुंबई : सर्वसामान्यांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसेस प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत आहेत. बसेसमध्ये कंत्राटी पद्धतीवर बसेस आल्यानंतर अपघातांचे प्रमाण वाढते आहे. जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२४ या दोन वर्षाच्या कालावधीत बेस्टच्या मालकीच्या व भाडेतत्त्वावरील बसेसचे १६० अपघात झाले. या अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला असून १५० जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी कुर्ला येथील अपघातात सात जणांचा जीव गेला असून ४२ जण जखमी झाले आहेत. वाढत्या बेस्ट अपघातामुळे बेस्ट सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.


बेस्ट बसची जगभरात ओळख आहे. सुरक्षित प्रवासासाठी बेस्ट बसला प्रवासी पसंती देतात. मात्र गेल्या दोन वर्षात अपघातांच्या घटना वाढत आहेत. सोमवारी कुर्ल्याच्या हादरवणा-या घटनेनंतर संताप व्यक्त केला जातो आहे. मागील दोन वर्षात विविध ठिकाणी झालेल्या घटनांत बेस्ट बसेसच्या १६० अपघातात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० जण जखमी झाल्याचे बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.


दादर टीटी खोदादाद सर्कल येथे बेस्ट उपक्रमाच्या तेजस्वीनी बसने सिग्नलवर उभ्या असलेल्या डंपरला मागून धडक दिल्याची घटना २ नोव्हेंबर २०२१ रोजी घडली होती. या दुर्घटनेत गंभीर जखमी चालकाच्या मृत्यूसह ३ जणांचा मृत्यू तर ८ जखमी झाले होते. तर भांडुप येथे ११ ऑगस्ट २०२१ रोजी बेस्ट बस इलेक्ट्रिक कॅबिनवर धडकली होती. या दुर्घटनेत वृद्धाचा मृत्यू तर दोन जखमी झाले होते. २२ जून २०२३ रोजी गिरगाव येथे बेस्ट बसला झालेल्या अपघातात वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.


बेस्ट उपक्रमाच्या प्रचलित पध्दतीनुसार मोटार अपघात दावा न्यायाधिकरण येथे दाखल करण्यात येतो. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये न्यायाधिकरणाने दिलेल्या निवाड्यानुसार व राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सुमेटाने निकाली काढण्यात आलेल्या एकूण १२ प्रकरणांत जखमींना ९ कोटी ७८ लाग २२ हजार ९७६ रुपये व एकूण ५३ प्रकरणांमध्ये मृतांच्या कायदेशीर वारसांना ११ कोटी २२ लाख ६८ हजार ५६६ रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. कुर्ला येथील बेस्ट अपघातात सात जणांचा जीव गेला आहे. तर ४२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बेस्टने मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे. तर मुंबई महापालिका बेस्ट प्रशासनाकडून जखमींवरील उपचार मोफत केले जाणार आहेत.

Comments
Add Comment

रानडे मार्गावर ठेच लागून ज्येष्ठ नागरिकावर जखमी होण्याची आली वेळ, कुटुंबाने महापालिकेकडे ही मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ आणि खोदलेले रस्ते पुन्हा योग्यप्रकारे न बनवल्यास ते असमांतर बनवून

मध्यप्रदेशच्या तरुणांनी महापालिकेच्या वाहनतळाचा घेतला ताबा... महापालिकेने उचलले हे पाऊल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हुतात्मा चौक येथील वाहनतळाच्याठिकाणी महापालिकेच्यावतीने निशुल्क सेवा दिली जात

मुंबई विमानतळावर विमानांचा मोठा अपघात टळला

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक मोठी बातमी आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण २०२६; शहर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये सहभागी व्हा, नागरिकांना मुंबई मनपाचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : केंद्र शासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ चा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यंदाच्या

सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध