राजापूर शहरात बिबट्याचा वावर सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

रत्नागिरी : राजापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी समर्थनगर भटाळी रस्त्यावर राजापूर नगर वाचनालयासमोर रात्री, बाजारपेठ रस्त्यावर सकाळी बिबट्याचा स्वैर वावर नागरिकांना दिसून आल्याने घबराट पसरली आहे.


याच भागात काही महिन्यांपूर्वी एका महिला महसूल अधिकाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळी येथे बिबट्या नाहीच, असे ठासून सांगण्यात वन विभागाचे अधिकारी आघाडीवर होते. आता बिबट्याचा वावर लोकवस्तीत झाल्याने तेथील नागरिकांना अस्वस्थता आणि भीती पसरली आहे. या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने त्याबाबत ॲड. पराग हर्डीकर यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. ॲड. अभिजित ढवळे यांनी आपल्या अंगणात बिबट्याचे ठसे आढळून येत असल्याची माहिती दिली. ॲड. ढवळे यांच्याकडे असलेल्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी बिबट्याचा वावर असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.


शहराच्या विविध भागात बिबट्याच्या वावराबाबत प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी वन विओभागाला कळवले असले, तरी मानवी वन विभागाकडून हालचाल झालेली नाही. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाला आर्थिक मदत देण्याबाबत शासन घोषणा करते. मात्र, नागरी वस्तीतील बिबट्याच्या वावराबद्दल सातत्यपूर्ण उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे आपला जीव वाचवण्याची जबाबदारी आपली, अशी आफत जनतेवर ओढवली आहे.

Comments
Add Comment

प्रेम बिर्‍हाडेचा 'नोकरी'चा दावा खोटा? कॉलेजने उघड केले धक्कादायक सत्य!

पुणे: लंडनमध्ये आपली नोकरी गमावल्याचा भावनिक दावा करत समाजमाध्यमांवर प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या प्रेम

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का, 'या' बड्या नेत्याने दिले पक्षांतराचे संकेत

मुंबई: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे

यंदा राज्यात दहा ठिकाणी दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सांस्कृतिक कार्य विभागाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने यंदा राज्यात दहा ठिकाणी

‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ विशेष तपासणी अभियानांतर्गत राज्यात ३ हजार ४८५ अन्न आस्थापनांची तपासणी

मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत राज्यात ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ हे विशेष तपासणी

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अनाथ मुलांसोबत साजरी केली दिवाळी

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे फक्त दिव्यांचा, फटाक्यांचा किंवा सजावटीचा उत्सव नाही तर तो माणुसकीचा, प्रेमाचा आणि

Vittal Mandir : वारकऱ्यांचा संताप अनावर! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीत 'चिकन मसाला'; बीव्हीजी कंपनी अडचणीत

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात कर्मचाऱ्यांना देण्यात