राजापूर शहरात बिबट्याचा वावर सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  49

रत्नागिरी : राजापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी समर्थनगर भटाळी रस्त्यावर राजापूर नगर वाचनालयासमोर रात्री, बाजारपेठ रस्त्यावर सकाळी बिबट्याचा स्वैर वावर नागरिकांना दिसून आल्याने घबराट पसरली आहे.


याच भागात काही महिन्यांपूर्वी एका महिला महसूल अधिकाऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता. त्यावेळी येथे बिबट्या नाहीच, असे ठासून सांगण्यात वन विभागाचे अधिकारी आघाडीवर होते. आता बिबट्याचा वावर लोकवस्तीत झाल्याने तेथील नागरिकांना अस्वस्थता आणि भीती पसरली आहे. या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने त्याबाबत ॲड. पराग हर्डीकर यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे. ॲड. अभिजित ढवळे यांनी आपल्या अंगणात बिबट्याचे ठसे आढळून येत असल्याची माहिती दिली. ॲड. ढवळे यांच्याकडे असलेल्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी बिबट्याचा वावर असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.


शहराच्या विविध भागात बिबट्याच्या वावराबाबत प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी वन विओभागाला कळवले असले, तरी मानवी वन विभागाकडून हालचाल झालेली नाही. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकाला आर्थिक मदत देण्याबाबत शासन घोषणा करते. मात्र, नागरी वस्तीतील बिबट्याच्या वावराबद्दल सातत्यपूर्ण उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे आपला जीव वाचवण्याची जबाबदारी आपली, अशी आफत जनतेवर ओढवली आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली