PMP Bus : ‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच येणार ४०० बस

  65

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपी) आणि केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेच्या (सीआयआरटी) अधिकाऱ्यांनी ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसच्या प्रतिकृतीची (प्रोटोटाइप) पाहणी केली असून, त्याच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे. लवकरच बसच्या उत्पादनाला सुरुवात होईल.

फेब्रुवारीमध्ये ४०० नवीन सीएनजी बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यातून दररोज सुमारे तीन लाख प्रवाशांची वाहतूक होईल.‘पीएमपी’मध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन बसचा प्रश्‍न रेंगाळला होता. संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळूनही बसखरेदीला उशीर झाला. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण सांगण्यात आले. आता नवीन बस खरेदीला गती प्राप्त झाली आहे.

नुकतेच ‘सीआयआरटी’ व ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी एकत्रित नवीन बसच्या प्रोटोटाइपची पाहणी केली. त्याबद्दल दोन्ही संस्था सकारात्मक असून, लवकरच उत्पादनास सुरुवात होणार आहे. फेब्रुवारीमध्ये ४०० बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील, असे नियोजन केले आहे.


दररोज ४५ बस ब्रेकडाउन!


‘पीएमपी’च्या ताफ्यात २ हजार १०० बस असल्या, तरीही प्रत्यक्षात १ हजार ६५० बस धावतात. त्यापैकी सुमारे ४५ बस दररोज ब्रेकडाउन होतात. शिवाय आयुर्मान संपलेल्या बसची संख्याही जास्त आहे. त्यामुळे प्रवासी सेवेवर मोठा परिणाम होत आहे. यात नवीन बसची खरेदी होणे खूप आवश्यक होते. नव्या बसमुळे प्रवासी सेवा सुधारेल. सध्या बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना फटका बसत आहे.

पहिल्या टप्प्यात भाडेतत्त्वावरील ४०० बस दाखल होतील. दुसऱ्या टप्प्यात स्वमालकीच्या २०० बस दाखल होणार आहेत. दोन्ही बस ‘सीएनजी’वर धावतील. बसची संख्या वाढल्याने पीएमपीची प्रवासी सेवा अधिक चांगली होण्यास मदत मिळेल

 

 
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या