PMP Bus : ‘पीएमपी’च्या ताफ्यात लवकरच येणार ४०० बस

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपी) आणि केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेच्या (सीआयआरटी) अधिकाऱ्यांनी ‘सीएनजी’वर धावणाऱ्या बसच्या प्रतिकृतीची (प्रोटोटाइप) पाहणी केली असून, त्याच्या उत्पादनाला मंजुरी दिली आहे. लवकरच बसच्या उत्पादनाला सुरुवात होईल.

फेब्रुवारीमध्ये ४०० नवीन सीएनजी बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे प्रवास सुरळीत होण्यास मदत होणार आहे. यातून दररोज सुमारे तीन लाख प्रवाशांची वाहतूक होईल.‘पीएमपी’मध्ये गेल्या काही दिवसांपासून नवीन बसचा प्रश्‍न रेंगाळला होता. संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता मिळूनही बसखरेदीला उशीर झाला. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेचे कारण सांगण्यात आले. आता नवीन बस खरेदीला गती प्राप्त झाली आहे.

नुकतेच ‘सीआयआरटी’ व ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी एकत्रित नवीन बसच्या प्रोटोटाइपची पाहणी केली. त्याबद्दल दोन्ही संस्था सकारात्मक असून, लवकरच उत्पादनास सुरुवात होणार आहे. फेब्रुवारीमध्ये ४०० बस ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल होतील, असे नियोजन केले आहे.


दररोज ४५ बस ब्रेकडाउन!


‘पीएमपी’च्या ताफ्यात २ हजार १०० बस असल्या, तरीही प्रत्यक्षात १ हजार ६५० बस धावतात. त्यापैकी सुमारे ४५ बस दररोज ब्रेकडाउन होतात. शिवाय आयुर्मान संपलेल्या बसची संख्याही जास्त आहे. त्यामुळे प्रवासी सेवेवर मोठा परिणाम होत आहे. यात नवीन बसची खरेदी होणे खूप आवश्यक होते. नव्या बसमुळे प्रवासी सेवा सुधारेल. सध्या बसची संख्या कमी असल्याने प्रवाशांना फटका बसत आहे.

पहिल्या टप्प्यात भाडेतत्त्वावरील ४०० बस दाखल होतील. दुसऱ्या टप्प्यात स्वमालकीच्या २०० बस दाखल होणार आहेत. दोन्ही बस ‘सीएनजी’वर धावतील. बसची संख्या वाढल्याने पीएमपीची प्रवासी सेवा अधिक चांगली होण्यास मदत मिळेल

 

 
Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये