कुर्ला परिसरात भरधाव बसने ३० जणांना उडवले, ४ जणांचा मृत्यू तर २५ जखमी

मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एक मोठा अपघात घडला. बेस्टची ३३२ नंबरची बस अनियंत्रित झाली आणि या बसने अनेक वाहनांना तसेच साधारण ३० लोकांना उडवली. त्यानंतर एका सोसायटीची भिंत तोडून थांबली. या भीषण अपघतात ४ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले.


या अनियंत्रित बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेस्टची ही बस कुर्ला येथून अंधेरीला जात होती तेव्हा आंबेडकर नगरमधील बुद्ध कॉलनीजवळ या बसचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने ३० जणांना चिरडले. यात अनेकजण गंभीर जखमी झाले तर काहींचा जीवही गेला. जखमींना भाभा आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या घटनेनंतर रस्त्यावर एकच गर्दी जमली. यामुळे गोंधळही झाला. स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करताना बस चालकाला ताब्यात घेतले. फायर ब्रिगेड आणि अॅम्ब्युलन्सची टीमही तातडीने घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू आहे.


कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जाणारी ३२२ नंबरची बस कुर्ला स्थानकातून निघाली. अचानक बसचा वेग इतका वाढला की जे कोणी समोर आले त्यांना धडक देत ही बस निघाली. अखेर सोसायटीच्या भिंतीला आदळल्याने ही बस थांबली.



चालक ताब्यात, तपास सुरू


पोलिसांनी बसच्या ड्रायव्हरला अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. तसेच या अपघाताचे खरे कारण काय होते याचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी याबाबत केस दाखल केली असून तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

अवयव प्रत्यारोपणासाठी देशव्यापी एकसमान धोरणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

दानकर्त्यांची प्रत्यारोपणानंतर वैद्यकीय काळजी बंधनकारक… मुंबई : देशभर अवयव प्रत्यारोपणासाठी एकसमान व

मालाड, कांदिवली, माटुंगा, परळमधील उद्याने, क्रीडांगणाचा होणार विकास

महापालिकेने मागवली २६ कोटींची निविदा मुंबई (खास प्रतिनिधी) : मालाड (पूर्व), येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे

मुंबईत २०० पेक्षा वायू गुणवत्ता निर्देशांक असल्यास उद्योग आणि बांधकामे बंद करा

महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्यांचा गय

मुंबईत निवडणुकीची चाहूल; राज्य सरकारचा पुनर्विकासाला चालना देणारा मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील बृहन्मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राज्य सरकारने नागरिकांना थेट लाभ

मुंबईकर गारठले; थंडीमुळे पारा १६.२ अंशावर !

मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांत हिवाळ्याची चाहूल

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.