कुर्ला परिसरात भरधाव बसने ३० जणांना उडवले, ४ जणांचा मृत्यू तर २५ जखमी

मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एक मोठा अपघात घडला. बेस्टची ३३२ नंबरची बस अनियंत्रित झाली आणि या बसने अनेक वाहनांना तसेच साधारण ३० लोकांना उडवली. त्यानंतर एका सोसायटीची भिंत तोडून थांबली. या भीषण अपघतात ४ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले.


या अनियंत्रित बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेस्टची ही बस कुर्ला येथून अंधेरीला जात होती तेव्हा आंबेडकर नगरमधील बुद्ध कॉलनीजवळ या बसचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने ३० जणांना चिरडले. यात अनेकजण गंभीर जखमी झाले तर काहींचा जीवही गेला. जखमींना भाभा आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या घटनेनंतर रस्त्यावर एकच गर्दी जमली. यामुळे गोंधळही झाला. स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करताना बस चालकाला ताब्यात घेतले. फायर ब्रिगेड आणि अॅम्ब्युलन्सची टीमही तातडीने घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू आहे.


कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जाणारी ३२२ नंबरची बस कुर्ला स्थानकातून निघाली. अचानक बसचा वेग इतका वाढला की जे कोणी समोर आले त्यांना धडक देत ही बस निघाली. अखेर सोसायटीच्या भिंतीला आदळल्याने ही बस थांबली.



चालक ताब्यात, तपास सुरू


पोलिसांनी बसच्या ड्रायव्हरला अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. तसेच या अपघाताचे खरे कारण काय होते याचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी याबाबत केस दाखल केली असून तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

महानगरपालिकेच्या सर्वच कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’चे पूर्ण राष्ट्रीय गीत वाजणार, सभागृहात केला ठराव मंजूर

मुंबई: भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणादायी आणि शक्तीशाली नारा ठरलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय

मुंबई महापालिकेची सर्व परिपत्रके मराठीतूनच काढा; भाजपचे स्वीकृत नगरसेवक प्रविण छेडा यांची सभागृहात मागणी

मुंबई: मुंबई महापालिकेचे कामकाज हे शंभर टक्के मराठीतून असतानाही आजही कामगारां विषयांच्या तसेच इतर बाबींची

महापालिका सभागृहात गुंजणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’; महापालिका सभागृहात एकमताने ठराव मंजूर

मुंबई: महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत असलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताची धून आता

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क