मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एक मोठा अपघात घडला. बेस्टची ३३२ नंबरची बस अनियंत्रित झाली आणि या बसने अनेक वाहनांना तसेच साधारण ३० लोकांना उडवली. त्यानंतर एका सोसायटीची भिंत तोडून थांबली. या भीषण अपघतात ४ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले.
या अनियंत्रित बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेस्टची ही बस कुर्ला येथून अंधेरीला जात होती तेव्हा आंबेडकर नगरमधील बुद्ध कॉलनीजवळ या बसचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने ३० जणांना चिरडले. यात अनेकजण गंभीर जखमी झाले तर काहींचा जीवही गेला. जखमींना भाभा आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर रस्त्यावर एकच गर्दी जमली. यामुळे गोंधळही झाला. स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करताना बस चालकाला ताब्यात घेतले. फायर ब्रिगेड आणि अॅम्ब्युलन्सची टीमही तातडीने घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू आहे.
कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जाणारी ३२२ नंबरची बस कुर्ला स्थानकातून निघाली. अचानक बसचा वेग इतका वाढला की जे कोणी समोर आले त्यांना धडक देत ही बस निघाली. अखेर सोसायटीच्या भिंतीला आदळल्याने ही बस थांबली.
पोलिसांनी बसच्या ड्रायव्हरला अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. तसेच या अपघाताचे खरे कारण काय होते याचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी याबाबत केस दाखल केली असून तपास केला जात आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…