कुर्ला परिसरात भरधाव बसने ३० जणांना उडवले, ४ जणांचा मृत्यू तर २५ जखमी

मुंबई: मुंबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास एक मोठा अपघात घडला. बेस्टची ३३२ नंबरची बस अनियंत्रित झाली आणि या बसने अनेक वाहनांना तसेच साधारण ३० लोकांना उडवली. त्यानंतर एका सोसायटीची भिंत तोडून थांबली. या भीषण अपघतात ४ जणांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले.


या अनियंत्रित बसने अनेक वाहनांचेही नुकसान केले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेस्टची ही बस कुर्ला येथून अंधेरीला जात होती तेव्हा आंबेडकर नगरमधील बुद्ध कॉलनीजवळ या बसचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने ३० जणांना चिरडले. यात अनेकजण गंभीर जखमी झाले तर काहींचा जीवही गेला. जखमींना भाभा आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


या घटनेनंतर रस्त्यावर एकच गर्दी जमली. यामुळे गोंधळही झाला. स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करताना बस चालकाला ताब्यात घेतले. फायर ब्रिगेड आणि अॅम्ब्युलन्सची टीमही तातडीने घटनास्थळी पोहोचत बचावकार्य सुरू आहे.


कुर्ला पश्चिम येथून अंधेरीला जाणारी ३२२ नंबरची बस कुर्ला स्थानकातून निघाली. अचानक बसचा वेग इतका वाढला की जे कोणी समोर आले त्यांना धडक देत ही बस निघाली. अखेर सोसायटीच्या भिंतीला आदळल्याने ही बस थांबली.



चालक ताब्यात, तपास सुरू


पोलिसांनी बसच्या ड्रायव्हरला अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली जात आहे. तसेच या अपघाताचे खरे कारण काय होते याचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी याबाबत केस दाखल केली असून तपास केला जात आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण