Mango Season : यंदा आंब्याची चव चाखण्यासाठी वाट पाहावी लागणार!

बदलत्या वातावरणामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली


डहाणू : आंबा मोहोराला (Mango blossom) पोषक असणारी थंडी काही दिवसांपासून गायब झाल्याने यंदा आंबे उशीरा चाखायला (Mango Season) मिळणार आहेत. फेंगल वादळाचे (Fengal Cyclone) पडसाद कोकण किनारपट्टीवर दिसून आले. आठवडाभरापासून पालघर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आला आहे. ऑक्टोबर अखेरीस थंडी पडण्यास सुरुवात होते; परंतु यंदा परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने थंडी पडण्यास उशीर झाला. त्यानंतर फेइंजल वादळाने वातावरणात कमालीचा बदल झाला असून, मोहोर येण्यास विलंब होणार असल्याने आंब्याचा हंगाम दीड ते दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा आंबे उशीरा चाखायला मिळणार आहेत.



मे महिन्यातील हंगाम जूनपर्यंत गेल्यामुळे पावसामुळे आंब्याला योग्य दर मिळणे कठीण जाईल, त्याचबरोबर जास्त दिवस बागांची रखवाली आणि औषध फवारणी करावी लागणार असल्याने बागायतदारांच्या अर्थकारणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणाने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना सुरुवातीपासून चिंतेत टाकले आहे. हे सातत्य अद्याप कायम आहे. नोव्हेंबरअखेरीस हवामानात गारठा जाणवायला सुरुवात झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले होते; मात्र फेइंजल वादळामुळे अचानक थंडी गायब झाल्याने तापमानात वाढ झाली आहे.



वातावरणाचा फळांवर परिणाम


ढगाळ वातावरण, वाढलेल्या उष्म्यामुळे फळझाडांवरील मोहोर गळून पडण्याची शक्यता आहे. तसेच नवी पालवी फुटेल. मोहोर न येता पालवी कडक होण्याची शक्यता आहे. मोहोर संरक्षण केलेल्या फळबागांचे फारसे नुकसान होणार नाही. पण मोहोर टिकविण्यासाठी औषधे व किटकनाशके फवारणी केल्यास फळबागांना संरक्षण कवच मिळेल; मात्र या सर्व उपाययोजना करणे सर्वांनाच शक्य होणार नाही.



आंब्याचे पीक कमी प्रमाणात राहण्याची शक्यता


एप्रिल-मेपर्यंत येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचा हंगाम जून महिन्यापर्यंत लांबणीवर जाऊ शकतो. याच दरम्यान मोठ्या प्रमाणात पीक येणार असला तरी त्याला योग्य किंमत मिळेल, याचीही शाश्वती नाही. (Mango Season)

Comments
Add Comment

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त

Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती मुंबई : राज्य शासनाने

Animal Beauty Parlor : तुम्हाला माहित आहे का? या गावाने चक्क सुरु केलंय, महाराष्ट्रात जनावरांच पाहिलं ब्युटी पार्लर; जाणून घ्या सविस्तर

सातारा : महाराष्ट्रातील गावं आता सुजलाम आणि सुफलाम होण्याच्या दिशेने आपली पाऊले उचलत आहेत. शासनाच्या अनेक योजना

Nanded News : नांदेड हादरले! नाल्यातील साचलेल्या पाण्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

नांदेड : नांदेड शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. शहरातील देगलूर नाका परिसरातील