Mango Season : यंदा आंब्याची चव चाखण्यासाठी वाट पाहावी लागणार!

बदलत्या वातावरणामुळे आंब्याला मोहोर येण्याची प्रक्रिया लांबली


डहाणू : आंबा मोहोराला (Mango blossom) पोषक असणारी थंडी काही दिवसांपासून गायब झाल्याने यंदा आंबे उशीरा चाखायला (Mango Season) मिळणार आहेत. फेंगल वादळाचे (Fengal Cyclone) पडसाद कोकण किनारपट्टीवर दिसून आले. आठवडाभरापासून पालघर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने थंडी गायब झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय आला आहे. ऑक्टोबर अखेरीस थंडी पडण्यास सुरुवात होते; परंतु यंदा परतीच्या पावसाचा मुक्काम लांबल्याने थंडी पडण्यास उशीर झाला. त्यानंतर फेइंजल वादळाने वातावरणात कमालीचा बदल झाला असून, मोहोर येण्यास विलंब होणार असल्याने आंब्याचा हंगाम दीड ते दोन महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा आंबे उशीरा चाखायला मिळणार आहेत.



मे महिन्यातील हंगाम जूनपर्यंत गेल्यामुळे पावसामुळे आंब्याला योग्य दर मिळणे कठीण जाईल, त्याचबरोबर जास्त दिवस बागांची रखवाली आणि औषध फवारणी करावी लागणार असल्याने बागायतदारांच्या अर्थकारणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. बदलत्या वातावरणाने जिल्ह्यातील आंबा बागायतदारांना सुरुवातीपासून चिंतेत टाकले आहे. हे सातत्य अद्याप कायम आहे. नोव्हेंबरअखेरीस हवामानात गारठा जाणवायला सुरुवात झाली. त्यामुळे आंब्याला मोहोर येण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले होते; मात्र फेइंजल वादळामुळे अचानक थंडी गायब झाल्याने तापमानात वाढ झाली आहे.



वातावरणाचा फळांवर परिणाम


ढगाळ वातावरण, वाढलेल्या उष्म्यामुळे फळझाडांवरील मोहोर गळून पडण्याची शक्यता आहे. तसेच नवी पालवी फुटेल. मोहोर न येता पालवी कडक होण्याची शक्यता आहे. मोहोर संरक्षण केलेल्या फळबागांचे फारसे नुकसान होणार नाही. पण मोहोर टिकविण्यासाठी औषधे व किटकनाशके फवारणी केल्यास फळबागांना संरक्षण कवच मिळेल; मात्र या सर्व उपाययोजना करणे सर्वांनाच शक्य होणार नाही.



आंब्याचे पीक कमी प्रमाणात राहण्याची शक्यता


एप्रिल-मेपर्यंत येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील आंब्याचा हंगाम जून महिन्यापर्यंत लांबणीवर जाऊ शकतो. याच दरम्यान मोठ्या प्रमाणात पीक येणार असला तरी त्याला योग्य किंमत मिळेल, याचीही शाश्वती नाही. (Mango Season)

Comments
Add Comment

पोलिसांनी तरुणीसह आरोपींच्या फोनचे CDR काढले, हाती आली 'ही' माहिती

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा तपास पोलीस करत

कार्तिकी एकादशीसाठी मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वे, जाणून घ्या वेळापत्रक

सोलापूर: वारकऱ्यांसाठी कार्तिकी एकादशी महत्त्वाची असते. याच पंढरपूरच्या कार्तिकी

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह

"शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचेपर्यंत आमचा प्रयत्न सुरूच राहील" : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुष्काळमुक्तच नाही तर, हरित माणदेशाच्या दिशेने मार्गक्रमण! सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज फलटण,

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त