Nagpur Winter Session 2024 : ठरलं तर! या 'दिवशी' होणार हिवाळी अधिवेशन सुरु

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. त्यानंतर आता विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे. या संदर्भातील तारीख जाहीर करण्यात आली असून, १६ डिसेंबर रोजी नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली आहे.
विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

या अधिवेशनादरम्यान आमदारांचा शपथविधी, राज्यपालांचे अभिभाषण आदी पार पडेल. सध्या मुंबई राज्याचे ३ दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. हे सत्र आठवडाभर असेल. तसेच १२ डिसेंबरपासून सचिवालय आणि १५ डिसेंबरपर्यंत संपूर्ण सरकार नागपुरात दाखल होणार आहेत.

दरम्यान, नागपूरात होणाऱ्या अधिवेशनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर नवीन नावाच्या पाट्या लावण्यात येत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर नवीन नावाची प्लेट लावण्यात आली आहे. ज्यामधाये एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे असे लिहिले आहे. त्यांना देवगिरी बंगला देण्यात आलेला आहे.

विदर्भाचे अनेक प्रश्न या हिवाळी अधिवेशनात मार्गी लागणार का? प्रत्येकजण उत्सुक आहे. याशिवाय मुख्यमंत्री स्वतः विदर्भातील असल्याने लोकप्रतिनिधींसह विदर्भातील जनतेकडूनही विशेष अपेक्षा असल्याचे बोलले जाते. विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतले जात आहे.



दरम्यान, आज महाराष्ट्र सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेते उदय सामंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील, भाजपचे आमदार संजय कुटे आणि आमदार रवी राणा यांनी सरकारवर विश्वासदर्शक ठराव मांडला होता. यावेळी आवाजी मताने विश्वास दर्शक ठराव मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास करत आहे, अशा पद्धतीनं हा ठराव मांडण्यात आला. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, यांच्यासह कामकाज सल्लागार समितीचे सदस्य, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Add Comment

पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला, ६५ जण जखमी

पुणे : राजगड तालुक्यातील विहीर गावात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित पालखी सोहळ्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.

पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर उपाययोजना राबविण्याचे निर्देश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणावर

संगमनेर रोडवरील मॉडर्न चायनीज दुकानावर दगडफेक; पाण्याच्या बाटलीच्या पैशांवरून वाद

श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरातील संगमनेर रोड परिसरात महाराष्ट्र वाईनच्या समोरील मॉडर्न चायनीज दुकानावर किरकोळ

Malegaon News : मालेगावच्या महासभेत सत्ताधारी एकमेकांशी भिडले

मालेगाव : मतदार याद्यांचे पुनर्निरिक्षणाच्या मुद्द्यावरून मालेगाव महानगरपालिकेमध्ये सत्ताधारी एमआयएम आणि

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न