Solapur News : मका पिकाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांची नाराजी

सोलापूर : पावसातून वाचलेल्या मका पिकाला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांची नाराजी आणखी वाढली आहे. मक्याचे दर वाढण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे मका उत्पादक शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट निर्माण होत आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मक्याला गेल्या दोन महिन्यांपासून चांगला भाव मिळत नाही. मात्र, लागवड खर्चात वाढ होत आहे. तरीही दरात मोठी तफावत पाहायला मिळत आहे. शासनाने मका खरेदी केंद्र चालू करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. मक्याच्या व्यापार्‍याकडून शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे.


प्रतिक्विंटल ३ हजार रुपयांपर्यंत मिळणारा दर आता घसरून २१०० रुपयांवर आला आहे. मक्यामध्ये ओलावा असल्याचे कारण देत व्यापारी दर देत नाहीत. अतिवृष्टीतून वाचविलेले मका बाजारात विक्रीसाठी आणल्यानंतर दर मिळत नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. दर प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते २२०० रुपयांपर्यंत आहेत. मका उत्पादनासाठी काढणी व मळणी वगळता एकरी २० हजारांचा खर्च करावा लागतो. पाच वर्षांपूर्वी (२०२०-२१) नांगरणीचा खर्च १२०० रुपये, बियाणे प्रतिबॅग ८०० ते १५००, युरिया २४०, डीएपीसह मिश्रखते १०५० ते ११३० रुपयांना मिळत होती. दोन वेळच्या तणनाशकाचा खर्च १६००, तर तीनवेळा कीटकनाशक फवारणीचा खर्च ३००० रुपयांपर्यंत होता. काढणीसाठी अडीच हजारांपर्यंत, तर मळणीसाठी प्रतिपोती ७० रुपयांचा दर होता. त्यात आत दुपटीने वाढ झाली आहे. तुलनेत हमीभावात वाढ झाली नाही. गेल्या दोन वर्षांपासून मक्याला चांगला दर मिळत नाही. तोच नवीन आवक झाली आहे. या मक्याला २ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.


मक्याच्या दरात वाढ होत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत. सध्या मिळणार्‍या दरातून उत्पादन खर्चही शेतकर्‍यांच्या पदरात पडत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात मक्याच्या दरात मंदी पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत जाणवत आहे. सांगोला तालुक्यात शासनाने मका खरेदी केंद्र चालू करावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

Comments
Add Comment

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "

Chandrashekhar Bawankule : नार्को टेस्ट करण्यास मी तयार!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मनोज जरांगेंच्या आरोपांवर दिले सडेतोड उत्तर मुंबई :