सरकारने १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांसंदर्भातील दिली मोठी बातमी, काय सांगितलं?

नवी दिल्ली: देशातील चलनात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोखीचे व्यवहार करताना अनेक वेळा सुट्या पैशांची चणचण भासत होती. सुट्या पैशांची मागणी सर्रास होत होती. त्यात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटां नाहीत असचं सांगितलं जात होतं. त्यामुळे खरोखर देशात या नोटांचा तुटवडा किंवा चणचण आहे का असा खरा प्रश्न होता. या चर्चांना आता केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे. बाजारपेठेत कमी मूल्याच्या नोटांची कोणतीही कमतरता नसल्याचे सरकारने मंगळवारी राज्यसभेत स्पष्ट केले आहे.


केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत माहिती दिली की, भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) नोटांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. चालू आर्थिक वर्षात २६ फेब्रुवारीपर्यंत १० रुपयांच्या ४३९.४० कोटी नोटा, २० रुपयांच्या १९३.७० कोटी आणि ५० रुपयांच्या १३०.३० कोटी नोटा वितरित करण्यात आल्या आहेत. मागील आर्थिक वर्षात (२०२५) हा आकडा १० रुपयांच्या १८० कोटी, २० रुपयांच्या १५० कोटी आणि ५० रुपयांच्या ३०० कोटी नोटा इतका होता. अशी माहिती त्यांनी राज्यसभेत दिली.


कमी मूल्याच्या नोटा परंपरेने एटीएमद्वारे दिल्या जात नाहीत, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. मात्र, या नोटांच्या सुलभ वितरणासाठी एका 'पायलट प्रोजेक्ट'ची सुरुवात करण्यात आली असून, याद्वारे छोट्या मूल्यवर्गाच्या वितरकांकडून या नोटा जनतेपर्यंत पोहोचवल्या जात आहेत असं ही स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे या नोटांचा चलनात तुटवडा असल्याची बाब फेटाळून लावण्यात आली आहे. शिवाय त्या मुबलक प्रमाणात चलनात आहे हे स्पष्ट करण्यात आलं आहे.


नोटांसोबतच नाणी आणि डिजिटल पेमेंटमुळे दैनंदिन व्यवहारांची गरज पूर्ण होत आहे. रुपे केसीसी कार्डच्या माध्यमातून ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ३.७२ लाख डिजिटल व्यवहार झाले आहेत. त्यांची किंमत १११.१ कोटी रुपये इतकी आहे. लहान नोटा सहसा एटीएममध्ये उपलब्ध नसतात. ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने एक नवा प्रयोग (पायलट प्रोजेक्ट) हाती घेतला आहे. यामुळे छोट्या वितरकांमार्फत या नोटा थेट लोकांपर्यंत पोहोचतील. तसेच, वाढत्या डिजिटल पेमेंटमुळेही रोख रकमेवरील अवलंबित्व कमी झाल्याचे मंत्र्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Thane : मेट्रो, टनेल, पॉड टॅक्सी ते परवडणारी घरे; ठाणे बनतंय सुपर सिटी

ठाणे : “पूर्वी ‘पुणे तिथे काय उणे’ म्हटले जायचे; आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असे आत्मविश्वासाने म्हणण्याची वेळ आली

Jitendra Shelke Death : अशोक खरात यांचे निकटवर्तीयाचा ट्रकखाली चिरडून मृत्यू, पत्नी आणि मुलगा गंभीर

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, शुक्रवारी झालेल्या एका भीषण अपघातात

Heat wave : १३ राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा, काळजी घेण्याचे आवाहन

- अकोला देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक उष्ण शहर मुंबई : सध्या देशभरातील हवामानात मोठे बदल होत आहेत. काही

Corporate Jihad : कॉर्पोरेट जिहादवर काय म्हणाले मंत्री नितेश राणे ?

पिंपळगाव बसवंत : जबरदस्तीने नमाज पढायला लावणे आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अधिकृत तक्रारी प्राप्त

Transfer : जी. श्रीकांत छत्रपती संभाजीनगरचे नवे विभागीय आयुक्त

चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; जितेंद्र पापळकर यांची जीएसटी विभागात नियुक्ती मुंबई : राज्य शासनाने

Animal Beauty Parlor : तुम्हाला माहित आहे का? या गावाने चक्क सुरु केलंय, महाराष्ट्रात जनावरांच पाहिलं ब्युटी पार्लर; जाणून घ्या सविस्तर

सातारा : महाराष्ट्रातील गावं आता सुजलाम आणि सुफलाम होण्याच्या दिशेने आपली पाऊले उचलत आहेत. शासनाच्या अनेक योजना