Farmers Protest : शेतकऱ्यांचा पुन्हा दिल्ली चलो एल्गार! शंभू सीमेवरून १०१ शेतकरी कूच करणार

Share

नवी दिल्ली : दिल्लीत संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु असून यापार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे (Farmers Protest) हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा ‘दिल्ली चलो’चा (Delhi chalo) नारा दिला असून किसान मजदूर मोर्चा आणि एसकेएम गटातील १०१ शेतकरी आज दिल्लीकडे कूच करणार आहेत. परंतु हे आमदोलन रोखण्यासाठी पंजाब-हरियाणा सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आल्या आहेत.

शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान आधारभूत किंमतीसाठी कायदेशीर हमीसह त्यांच्या चिंता आणि मागण्यांबाबत केंद्राकडून चर्चेसाठी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज त्यांनी १०१ शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ दुपारी १२ च्या सुमारास दिल्लीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यादरम्यान केंद्राने शेतकरी आणि मजुरांशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला असून ते आम्हाला रोखण्यासाठी बळाचा वापर करत आहेत. त्यामुळे यावेळी ते शांततेत आणि शिस्तीने दिल्लीत जाणार असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?

नवीन भूसंपादन कायद्यानुसार १ जानेवारी २०१४ नंतर संपादित केलेल्या जमिनीच्या चौपट मोबदला मिळायला हवा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या १० वर्षांपासून गौतम बुद्ध नगरमध्ये सर्कलचे दर वाढलेले नाहीत. नवीन भूसंपादन कायद्याचा लाभ जिल्ह्यात लागू झाला पाहिजे. भूसंपादनाच्या बदल्यात १० टक्के विकसित जमीन द्यावी आणि ६४.७ टक्के दराने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. जमीनदार आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्विकासाचा लाभ मिळावा. उच्चाधिकार समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. लोकसंख्या असलेल्या क्षेत्राची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. हे सर्व निर्णय शासनस्तरावर घ्यायचे आहेत.

पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा

पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभूपासून दिल्लीकडे मोर्चा नेण्यासाठी १०१ शेतकऱ्यांनी काल सकाळी तयारी केली होती. मात्र काही मीटर अंतरावरच त्यांना हरियाणा सुरक्षा दलांनी टाकलेल्या बॅरिकेडमुळे थांबावे लागले. बॅरिकेडपर्यंत आंदोलक पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला आणि आंदोलकांना मागे जाण्यास भाग पाडले. (Farmers Protest)

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

23 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago