Farmers Protest : शेतकऱ्यांचा पुन्हा दिल्ली चलो एल्गार! शंभू सीमेवरून १०१ शेतकरी कूच करणार

नवी दिल्ली : दिल्लीत संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु असून यापार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे (Farmers Protest) हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा 'दिल्ली चलो'चा (Delhi chalo) नारा दिला असून किसान मजदूर मोर्चा आणि एसकेएम गटातील १०१ शेतकरी आज दिल्लीकडे कूच करणार आहेत. परंतु हे आमदोलन रोखण्यासाठी पंजाब-हरियाणा सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आल्या आहेत.


शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान आधारभूत किंमतीसाठी कायदेशीर हमीसह त्यांच्या चिंता आणि मागण्यांबाबत केंद्राकडून चर्चेसाठी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज त्यांनी १०१ शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ दुपारी १२ च्या सुमारास दिल्लीकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु यादरम्यान केंद्राने शेतकरी आणि मजुरांशी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला असून ते आम्हाला रोखण्यासाठी बळाचा वापर करत आहेत. त्यामुळे यावेळी ते शांततेत आणि शिस्तीने दिल्लीत जाणार असल्याचे सांगितले.



शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत?


नवीन भूसंपादन कायद्यानुसार १ जानेवारी २०१४ नंतर संपादित केलेल्या जमिनीच्या चौपट मोबदला मिळायला हवा, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या १० वर्षांपासून गौतम बुद्ध नगरमध्ये सर्कलचे दर वाढलेले नाहीत. नवीन भूसंपादन कायद्याचा लाभ जिल्ह्यात लागू झाला पाहिजे. भूसंपादनाच्या बदल्यात १० टक्के विकसित जमीन द्यावी आणि ६४.७ टक्के दराने भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. जमीनदार आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार आणि पुनर्विकासाचा लाभ मिळावा. उच्चाधिकार समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. लोकसंख्या असलेल्या क्षेत्राची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. हे सर्व निर्णय शासनस्तरावर घ्यायचे आहेत.



पोलिसांकडून अश्रुधुराचा मारा


पंजाब-हरियाणा सीमेवरील शंभूपासून दिल्लीकडे मोर्चा नेण्यासाठी १०१ शेतकऱ्यांनी काल सकाळी तयारी केली होती. मात्र काही मीटर अंतरावरच त्यांना हरियाणा सुरक्षा दलांनी टाकलेल्या बॅरिकेडमुळे थांबावे लागले. बॅरिकेडपर्यंत आंदोलक पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा मारा केला आणि आंदोलकांना मागे जाण्यास भाग पाडले. (Farmers Protest)

Comments
Add Comment

Shocking Incident : पप्पा, मला त्रास होतोय, पिरियड्स चालू आहेत... म्हणत लेक गयावया करत होती, पण नराधम बापाला दिसले फक्त ५००० रुपये! वाचा सुन्न करणारी बातमी

चिक्कमगलुरु : समाजात वडिलांना मुलीचे संरक्षक मानले जाते, मात्र कर्नाटकातील चिक्कमगलुरु जिल्ह्यातून पितृत्वाला

Hydrogen Train... देशातील पहिली पाण्यावर धावणारी ट्रेन येणार लवकरच येणार सेवेत; कधी कुठे धावणार जाणून घ्या

हरियाणा : भारतात अनेक हायड्रोजनवर आधारित प्रकल्पांवर भर दिला जात आहे. हायड्रोजन कार नंतर आता हायड्रोजन टेन ची ही

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दिल्लीत अनधिकृत मशिदीवर मनपाची कारवाई, दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एमसीडी अर्थात दिल्ली मनपाने तुर्कमान गेट परिसरातील

Petrol Diesel Price : गुड न्यूज! लवकरच पेट्रोल-डिझेलच्या किमती घसरणार; जाणून घ्या सविस्तर अपडेट

मुंबई : देशात सध्या महागाईचा आलेख सातत्याने उंचावत असून सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. जीवनावश्यक

अमेरिकन व्हिसा पाहिजे, तर साडेतेरा लाख जमा करा !

व्हिसा नाकारला गेला तर पैसे परत नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या व्हिसासाठी काही देशांतील नागरिकांना अर्ज

उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदारांची सखोल तपासणी

आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी