Maharashtra Weather : थंडी गायब; आता हिवाळ्यात निघतोय घाम!

  141

पाहा हवामान विभागाचे वृत्त काय सांगतेय?


चंद्रपूर : राज्यभरात थंडी गायब झाली असून राज्यात सध्या भर हिवाळ्यात उन्हाळ्याचा (Winter season) अनुभव मिळत आहे. परिणामी ढगाळ हवामानामुळे चांगलाच घाम (Heat Wave) निघत आहे. अशातच आज दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा (Heavy Rain) कायम असल्याचे हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे.



देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असल्याने काल पंजाबच्या 'अदमपूर' येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील नीचांकी ३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात मात्र पावसाला पोषक हवामान झाल्याने उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा झाला आहे. यातच उन्हाचा चटका वाढल्याने बहुतांश ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पार गेले आहे. थंडीची चाहूल लागल्यानंतर अचानक पावसाळी हवामान होत वाढलेला चटका अधिक तापदायक वाटत आहे.


राज्याच्या अनेक भागात अंशतः ढगाळ आकाश झाले असून, बऱ्याच ठिकाणी किमान तापमान १७.२ अंशांच्या पुढे गेल्याने थंडी नाहीशी झाली आहे. दिवसभर असलेल्या ढगाळ हवामानासह कमाल तापमानात वाढ झाली आहे. ब्रह्मपुरी येथे तापमान ३३ अंशांपार गेले आहे. चंद्रपूर येथे ३१.२ तर नागपूर येथे ३१.६ तर भंडारा येथे विदर्भात सर्वाधिक ३४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Comments
Add Comment

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या