Shahaji Bapu Patil : सांगोला माजी आमदारांच्या कार्यालयाबाहेर दगडफेक; फॉर्च्युनर फोडली!

करारा जबाव मिलेगा, संतप्त शिवसैनिकांची पोस्ट


सोलापूर : राज्यभरात सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम संपला असला तरीही विरोधकांची टोलेबाजी सुरुच आहे. अशातच काय झाडी, काय डोंगार, काय हाटील फेम माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या पुतण्याच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या फॉर्च्युनर गाडीवर एका अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली आहे. यावेळी कार्यालयात शहजी बापूंचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असताना हा प्रकार घडला. मात्र, दगड मारणारा तरुण पळून गेल्याने आता सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.


दरम्यान, शहाजी बापू पाटील हे कार्यालयात नसताना हा प्रकार घडला असून पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच संपापले आहेत. तसेच, शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असेही कार्यकर्त्यांनी सोशल मीडियातून म्हटले आहे.



शिवसैनिकांचा करारा जबाव


'जाहीर निषेध... करारा जबाव मिलेगा'. आज सांगोल्यात सागर पाटील यांच्यावर जो भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्याचा जाहीर निषेध. पोलिस प्रशासनाला विनंती आहे की, लवकरात लवकर कठोर कारवाई करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने हल्लेखोराना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल , अशी सोशल मीडिया पोस्ट पाटील समर्थकांकडून करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,