महायुतीचे आमदार २३२ आणि केवळ ४३ मंत्रीपदे; इच्छुकांची मनधरणी करणे हे देवेंद्र फडणवीसांसमोर मोठे आव्हान

मुंबई : महायुतीचा भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा पार पडला असताना दुसरीकडे मात्र आता मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग सुरू आहे. दरम्यान, अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. सध्या तिन्ही पक्षांतील मिळून २३४ आमदार आहेत आणि एकूण ४३ मंत्रिपदे आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्या इच्छुकांची मनधरणी करणे किंवा त्यांना शांत करणे हे सध्या देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोर मोठे आव्हान आहे.





शपथविधीच्या आधी शपथविधीवरून महायुतीत अनेक बैठका पार पडल्या आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट घेतली. त्यावेळी राज्यातून मंत्रिपदासाठी तसेच जे सतत वादग्रस्त वक्तव्य करतात आणि वादाच्या भोवऱ्यात सापडतात, अशा आमदारांचे दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींनी रिपोर्टकार्ड मागवले होते. यावेळी जे आमदार वादग्रस्त वक्तव्य करतात, अशा आमदारांना मंत्रिपदापासून लांब ठेवा किंवा अशा आमदारांना मंत्रिपद देऊ नका, असे दिल्लीतील भाजपा पक्षश्रेष्ठींनी राज्यातील भाजपा नेत्यांना कळविल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील अनेक वाचाळवीर आमदार आहेत. जे सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडतात, अशा आमदारांना यावेळी मंत्रिपदापासून लांबच राहावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.



मंत्रिमंडळ विस्तारात काही अनुभवी नेत्यांना किंवा यापूर्वी मंत्रिपद भूषविलेल्यांनादेखील डावलले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र महायुतीचे २३२ आमदार असताना आणि केवळ ४३ मंत्रिपदे असताना मंत्रिपदाची मान कुणाकुणाच्या गळ्यात पडणार आणि कोण-कोण इच्छुक नाराज होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


जर रेशो काढायचा म्हटले तर २८० आमदारांमागे आणि ४० मंत्रिपदानुसार ९ आमदारांमागे एक मंत्रिपद असे समीकरण असेल. त्यामुळे २८० आमदार आणि ४० मंत्रिपदे यांचे वाटप करताना देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मोठे आव्हान असून, ज्यांची ज्यांची मंत्रिपदासाठी भाऊगर्दी आहे, त्यांची मनधरणी करणे आणि त्यांना शांत करणे हेसुद्धा महायुतीतील प्रमुख नेत्यांसमोर आव्हान असल्याचेही जयंत माईणकर यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

BMC News : बेलगाम सल्लागार नियुक्ती बसणार आळा

सल्लागारांच्या निवडीबाबत तत्काळ धोरण बनवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई : मुंबई महापालिकेत

High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला येणार मोठी भरती

जून महिन्यात सलग ६ दिवस मोठ्या भरतीचे मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४

BJP-Shivsena : फेरीवाल्यांच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत श्रेयाची लढाई

आपल्या प्रयत्नांचे फळ दृष्टीपथात असल्याचा महापौरांचा दावा, शिवसेना म्हणते आमच्या प्रयत्नांना यश मुंबई : 

Mumbai : गोरेगाव मुलुंड जोड मार्गाच्या जुळया बोगद्याच्या कामाला जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग (जीएमएलआर) प्रकल्पाच्या टप्पा ३ - ब अंतर्गत दादासाहेब फाळके

Hareshwar Patil : माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे निधन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे बुधवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झाले. ते