Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवनिर्वाचित सरकारने केले महामानवाला अभिवादन

राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित


मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज शुक्रवारी (ता. ०६ डिसेंबर) ६८ वा महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्या दिवशी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमअनुयायी दादर, चैत्यभूमी येथे पोहोचले आहेत. अशातच राज्याचे नवेनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. यावेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सुद्धा उपस्थित होते. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर हा पहिलाच शासकीय कार्यक्रम आज चैत्यभूमी येथे पार पडला.



सकाळी ०८ वाजता राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दादर, चैत्यभूमी येथे पोहोचले. यावेळी त्यांनी तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर चैत्यभूमी येथील विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यानंतर विहाराच्या बाहेर पोलिसांच्यावतीने आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच मोठा शासकीय कार्यक्रम २४ तासांच्या आत पार पडला. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यानंतर चैत्यभूमीच्या आवारात असलेल्या दीपस्तंभाजवळ उभारण्यात आलेल्या व्यापीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भाषण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

Comments
Add Comment

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील