Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवनिर्वाचित सरकारने केले महामानवाला अभिवादन

राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित


मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज शुक्रवारी (ता. ०६ डिसेंबर) ६८ वा महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्या दिवशी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमअनुयायी दादर, चैत्यभूमी येथे पोहोचले आहेत. अशातच राज्याचे नवेनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. यावेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सुद्धा उपस्थित होते. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर हा पहिलाच शासकीय कार्यक्रम आज चैत्यभूमी येथे पार पडला.



सकाळी ०८ वाजता राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दादर, चैत्यभूमी येथे पोहोचले. यावेळी त्यांनी तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर चैत्यभूमी येथील विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यानंतर विहाराच्या बाहेर पोलिसांच्यावतीने आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच मोठा शासकीय कार्यक्रम २४ तासांच्या आत पार पडला. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यानंतर चैत्यभूमीच्या आवारात असलेल्या दीपस्तंभाजवळ उभारण्यात आलेल्या व्यापीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भाषण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल

खरडलेल्या शेतजमिनींसाठी मिळणार माती, गाळ, मुरूम, मोफत !

मुंबई : अतिवृष्टी व पुरामुळे खरडून गेलेल्या शेतजमिनीला पूर्वस्थितीत आणण्यासाठी लागणारी माती, गाळ, मुरूम, कंकर

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ