Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवनिर्वाचित सरकारने केले महामानवाला अभिवादन

  138

राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित


मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज शुक्रवारी (ता. ०६ डिसेंबर) ६८ वा महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्या दिवशी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमअनुयायी दादर, चैत्यभूमी येथे पोहोचले आहेत. अशातच राज्याचे नवेनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पोहोचले. यावेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सुद्धा उपस्थित होते. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर हा पहिलाच शासकीय कार्यक्रम आज चैत्यभूमी येथे पार पडला.



सकाळी ०८ वाजता राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दादर, चैत्यभूमी येथे पोहोचले. यावेळी त्यांनी तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर चैत्यभूमी येथील विहारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यानंतर विहाराच्या बाहेर पोलिसांच्यावतीने आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा पहिलाच मोठा शासकीय कार्यक्रम २४ तासांच्या आत पार पडला. त्यामुळे आजच्या या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. यानंतर चैत्यभूमीच्या आवारात असलेल्या दीपस्तंभाजवळ उभारण्यात आलेल्या व्यापीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी भाषण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.