Nylon Manja : नायलॉन मांजा, धाग्यांची निर्मिती व विक्रीस कायमस्वरुपी बंदी

यवतमाळ : प्लॅस्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्याच्या वेळी करण्यात येतो. या धाग्यामुळे पक्षांना तसेच मानवी जिवितांस तीव्र इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा धाग्यांच्या वापरास तसेच इतर वेळी नायलॉन मांज्याची धाग्यांची निर्मिती, विक्री, साठवणूक व वापर करण्यास संपूर्ण जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून कायमस्वरुपी बंदी घातली आहे.

संपूर्ण जिल्ह्यातील घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी तसेच साठवणूकदार यांना नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अशा अविघटनशील नायलॉन मांजामुळे गुरांना उद्भवणारा धोका, माती व पाण्याच्या गुणवत्तेची पातळी घसरणे तसेच एकंदरीत परिस्थितीत प्राणीजातीला उद्भवणाऱ्या इजांना प्रतिबंध याद्वारे करण्यात येत आहे.




पतंग उडविताना केलेल्या नायलॉन मांजाच्या वापरामुळे विजेच्या तारांवर घर्षण होऊन आग लागणे, उपकेंद्रे बंद पडणे, वीज उपकरणे बिघडणे, अपघात घडणे, इजा व जीवित हाणी होणे याबाबतची जनजागृती जिल्ह्यातील सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस विभागाने करावी, अशा सूचना देखील करण्यात आल्या आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती, संस्था पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ चे कलम १५ मध्ये नमूद शास्तीस पात्र होतील. जिल्ह्यातील सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलिस विभागाने पथके गठीत करुन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी त्यांच्या कार्यक्षेत्रात करावी, असे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

मुंबई लोकलमध्ये नियम कडक; मासिक पाससाठी लागू होणार 'हे' कडक नियम

मुंबई : लोकलमध्ये विनातिकिट किंवा बनावट तिकिटांचा वापर करुन प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी रेल्वे

सिडको घरांच्या किंमतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी; 'हे चालणार नाही, गरिबांसाठी ती घरं आहेत' बैठकीत स्पष्ट निर्देश

नागपूर: सिडको अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांच्या किंमतींमध्ये केलेल्या मोठ्या वाढीवरून निर्माण झालेल्या

जमिनीच्या अकृषिक वापरानंतर आता ‘सनद’ची अटही रद्द!

नागपूर : राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

मालवणीत २०१० नंतर विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत कशी वाढली? - मंत्री मंगल प्रभात लोढा यांता काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना सवाल

नागपूर : मुंबईतील मालाड-मालवणी भागात गेल्या १४ वर्षांत एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३६

चालान न भरणाऱ्या वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात मोठी घोषणा

नागपूर: महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आजच्या कामकाजात विधान परिषदेत नियम

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंतनवीन रस्ता निर्मितीस मान्यता

तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात - मुख्यमंत्री