Baba Siddhiqui Murder : आधी सलमान खानच होता पण...; बाबा सिद्दीकी गोळीबारप्रकरणात आरोपीचा खुलासा

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खान नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांसाठी चर्चेत असतो. सलमान खानचे अनेक चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान बिश्नोई प्रकरणात चर्चेत आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. फक्त हेच नाही तर सलमान खानच्या घरावर बिश्नोई टोळीकडून गोळीबार देखील करण्यात आला होता.


सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्यावर बिश्नोईच्या तीन शूटरकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर बिश्नोई टोळीकडून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आतापर्यंत २६ जणांना अटक करण्यात आलीये.



बाबा सिद्दीकी प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आता मोठा आणि धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. आरोपीने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या अगोदर सलमान खान हाच त्यांच्या निशाण्यावर होता. मात्र, कडक सुरक्षा असल्याने त्यांना सलमान खान याच्यावर गोळीबार करता आला नाही. त्यांनी अनेकवेळा सलमान खानवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलमान खानच्या आजूबाजुला जास्त सुरक्षा असल्याने ते शक्य झाले नाही.


आरोपीचे बोलणे ऐकून सलमान खानच्या चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे. वारंवार बाबा सिद्दीकी गोळीबारप्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. सततच्या धमक्यांमुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आलीये.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता