Baba Siddhiqui Murder : आधी सलमान खानच होता पण...; बाबा सिद्दीकी गोळीबारप्रकरणात आरोपीचा खुलासा

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. सलमान खान नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांसाठी चर्चेत असतो. सलमान खानचे अनेक चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान बिश्नोई प्रकरणात चर्चेत आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळताना दिसत आहेत. फक्त हेच नाही तर सलमान खानच्या घरावर बिश्नोई टोळीकडून गोळीबार देखील करण्यात आला होता.


सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांच्यावर बिश्नोईच्या तीन शूटरकडून गोळीबार करण्यात आला. यानंतर बिश्नोई टोळीकडून एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्यात आली. बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणी आतापर्यंत २६ जणांना अटक करण्यात आलीये.



बाबा सिद्दीकी प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आता मोठा आणि धक्कादायक खुलासा करण्यात आलाय. आरोपीने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांच्या अगोदर सलमान खान हाच त्यांच्या निशाण्यावर होता. मात्र, कडक सुरक्षा असल्याने त्यांना सलमान खान याच्यावर गोळीबार करता आला नाही. त्यांनी अनेकवेळा सलमान खानवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सलमान खानच्या आजूबाजुला जास्त सुरक्षा असल्याने ते शक्य झाले नाही.


आरोपीचे बोलणे ऐकून सलमान खानच्या चाहत्यांचे टेन्शन वाढले आहे. वारंवार बाबा सिद्दीकी गोळीबारप्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत. सततच्या धमक्यांमुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आलीये.

Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील