आसाम, मेघालय फिरण्याची संधी, कमी बजेटमध्ये IRCTCने आणलेय पॅकेज

मुंबई: वर्षाचा शेवटचा महिना सुरू आहे. याच महिन्यात ख्रिसमसचा(christmas) सणही साजरा केला जातो. तर ख्रिसमस संपताच नवे वर्ष सेलिब्रेट करण्याची संधी येते. म्हणजेच संपूर्ण वर्षभरात जी काही धावपळ, मेहनत केली जाते त्याचा थकवा घालवण्यासाठी डिसेंबर चांगली संधी आहे.डिसेंबरच्या महिन्यात थंडीही असते. यादरम्यान अनेक जण बाहेर फिरायला जातात.


अनेकजण भारतातील विविध सुंदर ठिकाणी फिरायला जातात. यात नॉर्थ ईस्टच्या राज्यांचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांबद्दल बोलायचे झाल्यास आसाम आणि मेघालय फिरण्यासाठी अनेक लोक जातात. आसामचे काझीरंगा पार्क आणि कामाख्या माता मंदिर येथे खूप गर्दी असते. जर तुम्हालाही येथे फिरायला जायचे असेल तर आयआरसीटीसीने शानदार पॅकेज आणले आहे.



IRCTC आसाम-मेघालय टूर पॅकेज


IRCTC अनेकदा प्रवाशांच्या सोयीसाठी देश-परदेशातील सुंदर शहरे फिरण्यासाठी शानदार टूर पॅकेज घेऊन येते. यावेळेस आयआरसीटीसीने Wonders of Assam & Meghalaya Ex Bengaluru हे पॅकेज आणले आहे. यात तुम्हाला आसाम आणि मेघालयची सुंदरता पाहायला मिळेल. IRCTCच्या टूरम्ये तुम्हाला शिलाँग, चेरापुंजी, मावलिनोंग, काझीरंगा आणि गुवाहाटी ही शहरे फिरण्यासाठी मिळतील. हे पॅकेट फ्लाईट टूर पॅकेज असेल. हे ५ दिवस आणि ६ रात्रीचे पॅकेज असेल. यात तुम्हाला फिरण्यासाठी एसी बसची सुविधा मिळेल. सोबतच एक टूर गाईडही असेल.



द्यावे लागतील इतके पैसे


IRCTCच्या या आसाम आणि मेघालय टूरला १६ डिसेंबर २०२४ आणि २९ जानेवारी २०२५ या दोन तारखांना सुरूवात होईल. ज्या तारखेला तुम्हाला जायचे आहे तुम्ही बुकिंग करू शकता. एकट्याला या टूरवर जायचे असेल तर ४९५०० रूपये द्यावे लागतील. तर दोन लोक एकत्र या टूरवर जात असतील तर प्रति व्यक्ती ४२,५०० रूपये असतील. जर तीन लोक एकत्र जात असतील तर प्रती व्यक्ती ४०,७०० रूपये होतील. सोबतच ५ वर्षे ते ११ वर्षापर्यंतच्या मुलासाठी बेडसह ३५९९० रूपये तर बेडीशिवाय ३२९९० रूपये द्यावे लागतील.

Comments
Add Comment

Shravan : श्रावणात मांसाहार का करीत नाहीत? केवळ धार्मिक कारण की आणखी काही, आयुर्वेदाचे नियम काय सांगतात?

श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो. या दरम्यान भगवान शंकराची पूजा केली जाते. या काळात

नाचणीची भाकरी रोज खाणे योग्य आहे का? कॅलरी, प्रोटीन आणि फायद्यांची माहिती

नाचणीला सुपरफूड मानले जाते, कारण ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी, रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

अन्नाची अॅलर्जी : असहिष्णुता की संवेदनशीलता?

अनेकांना एखादा अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर शिंका येणे, श्वास घेताना घरघर होणे, अंगावर पुरळ उठणे, पोट फुगणे, जुलाब,

EAR CARE : कान स्वच्छ करताना बाळगा विशेष काळजी; टोकदार वस्तूंचा वापर ठरू शकतो घातक, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा

शरीराची स्वच्छता राखणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच कानांची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचे असते. मात्र, कानातील

Health Care : पावसाळा आणि आरोग्याची काळजी; आरओ की उकळलेले पाणी? कोणते पिणे योग्य?

पावसाळा सुरू झाला की वातावरणात बदल होतो आणि साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागतो. या दिवसांत दूषित

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे