Pushpa 2 : अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू!

हैदराबाद : अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट 'पुष्पा २'हा (Pushpa 2) सिनेमा येत्या ५ डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच पुष्पा २ने धुमाकूळ घातला आहे. अशातच काल हैदराबादमध्ये पुष्पा २चा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. परंतु यावेळी प्रीमियर ठिकाणी चाहत्यांची मोठी गर्दी झाली असून यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.



नेमके प्रकरण काय?


हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आलेला पुष्पा २चा प्रीमियरला अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना देखील उपस्थित होते. यावेळी त्या दोघांची झालक पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी झुंबड झाली होती.


दिलसुखनगर येथे राहणारी रेवती, पती भास्कर आणि त्यांची दोन मुले श्रीतेज (९) आणि सान्विका (७) यांच्यासोबत 'पुष्पा २' चा प्रीमियर शो पाहण्यासाठी आली होती. गर्दी गेटमधून ढकलत असताना रेवती आणि तिचा मुलगा श्रीतेज बेशुद्ध पडले. तसेच पीडित महिला (३९) ही थिएटरमध्ये बेशुद्ध पडली होती आणि तिला उपचारासाठी दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर दोन्ही मुले जखमी झाले आहेत.




Comments
Add Comment

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'