Pandharpur : विठ्ठलाचा मुक्काम गोपाळपूरात! काय आहे यामागची आख्यायिका?

  92

पंढरपूर : मार्गशीर्ष महिना (Margashirsha Month) हा देवांचा विश्रांती काळ असतो. याकाळात पंढरपुरातील विठूरायाही (Pandharpur Vitthal Temple) चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णुपदावर संपूर्ण महिनाभर मुक्कामासाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्गशिष महिना सुरु होताच विठुराया पंढरपूर जवळच असलेल्या गोपाळपूर येथील चंद्रभागेमध्ये असलेल्या विष्णूपद मंदिरात वास्तव्यास आले आहेत. यावेळी विष्णूपद मंदिरात भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र मार्गशिष महिन्यातील या विठुरायाच्या मुक्कामाची कोणती आख्यायिका आहे, जाणून घ्या.



शेकडो वर्षांपासून पाळल्या जाणाऱ्या परंपरेनुसार, जेव्हा रूक्मिणी विठुरायावर रूसून दिंडीर वनात आली, त्यावेळी देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले. ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक म्हणजे विष्णूपद. मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत याठिकाणी देवाचा मुक्काम असतो, अशी आख्यायिका आहे.


त्याचबरोबर विष्णूपद मंदिरात एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहूडाचरण पाऊले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची व काल्याच्या वाडग्याची खूण आहे. या शिळेवर दगडी मंडप उभारला आहे. येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहूडाचरण मुरलीधराची आकर्षक अशी मूर्ती कोरण्यात आली आहे. याच ठिकाणी विठुरायाने आपल्या सवंगडी व गाईसह क्रीडा केल्याचे व येथेच त्यांनी सर्वांसोबत भोजन केले होते. तेव्हापासून या ठिकाणी देवाची आणि गाईची पाऊले उमटले असल्याचेही म्हटले जाते.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून