Pandharpur : विठ्ठलाचा मुक्काम गोपाळपूरात! काय आहे यामागची आख्यायिका?

पंढरपूर : मार्गशीर्ष महिना (Margashirsha Month) हा देवांचा विश्रांती काळ असतो. याकाळात पंढरपुरातील विठूरायाही (Pandharpur Vitthal Temple) चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णुपदावर संपूर्ण महिनाभर मुक्कामासाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्गशिष महिना सुरु होताच विठुराया पंढरपूर जवळच असलेल्या गोपाळपूर येथील चंद्रभागेमध्ये असलेल्या विष्णूपद मंदिरात वास्तव्यास आले आहेत. यावेळी विष्णूपद मंदिरात भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र मार्गशिष महिन्यातील या विठुरायाच्या मुक्कामाची कोणती आख्यायिका आहे, जाणून घ्या.



शेकडो वर्षांपासून पाळल्या जाणाऱ्या परंपरेनुसार, जेव्हा रूक्मिणी विठुरायावर रूसून दिंडीर वनात आली, त्यावेळी देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले. ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक म्हणजे विष्णूपद. मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत याठिकाणी देवाचा मुक्काम असतो, अशी आख्यायिका आहे.


त्याचबरोबर विष्णूपद मंदिरात एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहूडाचरण पाऊले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची व काल्याच्या वाडग्याची खूण आहे. या शिळेवर दगडी मंडप उभारला आहे. येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहूडाचरण मुरलीधराची आकर्षक अशी मूर्ती कोरण्यात आली आहे. याच ठिकाणी विठुरायाने आपल्या सवंगडी व गाईसह क्रीडा केल्याचे व येथेच त्यांनी सर्वांसोबत भोजन केले होते. तेव्हापासून या ठिकाणी देवाची आणि गाईची पाऊले उमटले असल्याचेही म्हटले जाते.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार