Pandharpur : विठ्ठलाचा मुक्काम गोपाळपूरात! काय आहे यामागची आख्यायिका?

पंढरपूर : मार्गशीर्ष महिना (Margashirsha Month) हा देवांचा विश्रांती काळ असतो. याकाळात पंढरपुरातील विठूरायाही (Pandharpur Vitthal Temple) चंद्रभागेच्या तीरावर निर्जन आणि निसर्गरम्य अशा विष्णुपदावर संपूर्ण महिनाभर मुक्कामासाठी येतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्गशिष महिना सुरु होताच विठुराया पंढरपूर जवळच असलेल्या गोपाळपूर येथील चंद्रभागेमध्ये असलेल्या विष्णूपद मंदिरात वास्तव्यास आले आहेत. यावेळी विष्णूपद मंदिरात भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. मात्र मार्गशिष महिन्यातील या विठुरायाच्या मुक्कामाची कोणती आख्यायिका आहे, जाणून घ्या.



शेकडो वर्षांपासून पाळल्या जाणाऱ्या परंपरेनुसार, जेव्हा रूक्मिणी विठुरायावर रूसून दिंडीर वनात आली, त्यावेळी देवीच्या शोधात विठ्ठल ज्या ठिकाणी पंढरपुरात प्रथम आले. ते ठिकाण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातील मोठा खडक म्हणजे विष्णूपद. मार्गशीर्ष अमावस्येपर्यंत याठिकाणी देवाचा मुक्काम असतो, अशी आख्यायिका आहे.


त्याचबरोबर विष्णूपद मंदिरात एका मोठ्या शिळेवर मध्यभागी देवाचे समचरण आणि देहूडाचरण पाऊले उमटलेली आहेत. त्यासोबत काठी ठेवल्याची व काल्याच्या वाडग्याची खूण आहे. या शिळेवर दगडी मंडप उभारला आहे. येथील खांबावर चतुर्भुज समचरण विष्णुमूर्ती आणि देहूडाचरण मुरलीधराची आकर्षक अशी मूर्ती कोरण्यात आली आहे. याच ठिकाणी विठुरायाने आपल्या सवंगडी व गाईसह क्रीडा केल्याचे व येथेच त्यांनी सर्वांसोबत भोजन केले होते. तेव्हापासून या ठिकाणी देवाची आणि गाईची पाऊले उमटले असल्याचेही म्हटले जाते.

Comments
Add Comment

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक